Agrowon Podcast Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : बाजारातील कापूस खरेदी विक्री खरंच थांबली का?

Cotton Market : वायद्यांमध्ये कापूस दरात चांगली सुधारणा झाली आहे. पण बाजार समित्यांमधील कापूस भाव दबावातच आहेत. बाजारातील कापूस आवक गेल्यावर्षीपेक्षा जास्तच दिसते. दुसरीकडे बाजारातील कापूस उलाढाल काहीशी मंदावलेली दिसते.

Team Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले


आंतरराष्ट्रीय बाजारता सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा झाली. सोयाबीनचे वायदे एक टक्क्याने वाढून १४ डाॅलरवर पोचले होते. तर सोयापेंडने ४१९ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील नवा हंगाम तोंडावर आहे. त्यात गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीन जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे बाजार सध्या स्थिर आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव आणखी काही दिवस स्थिर दिसू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा दर दबावातच

कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्यानंतर बाजारात भाव कमी झाले आहेत. नाफेडने कांदा खरेदी सुरु केली. पण नाफेडच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारा कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नाफेडच्या खेरदीचा शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता नाही. सध्या कांद्याला १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण कांद्याचे भाव जास्त दिवस दबावात राहणार नाहीत, असे जाणकारांनी सांगितले.
 

टोमॅटोचे भाव नरमले

3. देशातील बाजारात टोमॅटोचे भाव आता नरमले आहेत. अनेक बाजारात टोमॅटोचे भाव एक हजार रुपयांच्या दरम्यान आले. बाजारातील आवक वाढली पण ती सरकारच्या अपेक्षेपेक्षा कमीच आहे. सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ७०० ते २ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. टोमॅटोचे भाव पुढील काही दिवस कायम दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कारल्याचे बाजारभाव टिकून


4. राज्यातील बाजारात कारल्याचे भाव टिकून आहेत. कारली पिकाला जुलै महिन्यात जोरदार पाऊस आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडाचा फटका बसला. यामुळे बाजारात येणारा माल कमी आहे. त्यामुळेच कारल्याचे भाव टिकून आहेत.  सध्या कारल्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजारांचा भाव मिळत आहे. कारल्याचे भाव पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

 5. बाजारातील कापूस खरेदी विक्री खरचं थांबली का? 

वायद्यांमध्ये कापूस दरात चांगली सुधारणा झाली आहे. पण बाजार समित्यांमधील कापूस भाव दबावातच आहेत. बाजारातील कापूस आवक गेल्यावर्षीपेक्षा जास्तच दिसते. दुसरीकडे बाजारातील कापूस उलाढाल काहीशी मंदावलेली दिसते. अनेक ठिकाणी व्यवहार थांबले. त्यामुळे कापूस खरेदी बंद झाल्याची चर्चा सुरु आहे. पण त्याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक जिनिंग मेंटनन्सवर गेल्या आहेत. एरवी ऑक्टोबर ते मार्च या काळात कापसाची जास्त आवक असते. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये अनेक जिनिंग मेंटनन्सवर जातात. पण यंदा बाजारातील कापूस आवक ऑगस्टपर्यंतही सुरु आहे. यामुळे अनेक जिनिंग आता मेंटनन्सवर जात आहेत. सप्टेंबरपासून जिनिंग पुन्हा सुरु व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर जिनिंगचा नवा हंगाम सुरु होऊन कापूस उलाढालही वाढेल. सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा देशातील कापूस पिकाला कमी पावसाचा फटका बसत आहे. यामुळे कापूस उत्पादकता घटेल, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. पण देशाचा कापूस वापर गेल्यावर्षीपेक्षा जास्तच राहील, असा अंदाज आहे. परिणामी ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नव्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे, असे अभ्यासकांनी सांगितले. 
……………..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT