Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगाच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारला तीन पत्रे पाठवली आहेत. इथेनॉल खरेदीचे दर व साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) यात तातडीने वाढ करावी, तसेच साखर निर्यातीला मुदतवाढ द्यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत. .केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायूमंत्री हरदीप पुरी यांना पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी २०२५-२६ मधील इथेनॉलचे खरेदी दर वाढविण्याची मागणी केली आहे. उसाचा रस, पाक व साखरेपासून तयार झालेल्या इथेनॉलसाठी प्रति लिटर ७२ रुपये, बी हेवी मळीपासूनच्या इथेनॉलसाठी ६९ रुपये, तर सी हेवी मळीपासून तयार केलेल्या इथेनॉलकरिता ६१.२० रुपये दर द्यावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे..Sugar Export : साखर उत्पादन वाढण्याची शक्यता; निर्यात कोटा २० लाख टनांपर्यंत वाढवा, उद्योगाची मागणी .ऊस व मक्यापासून तयार झालेल्या इथेनॉलची कोटानिहाय खरेदी करताना महाराष्ट्रातून किमान ९० टक्के इथेनॉल खरेदी उसापासून तयार झालेल्या इथेनॉलचीच करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे..एफआरपी वाढविल्यानंतर इथेनॉलचा उत्पादन खर्च वाढला आहे. मात्र, इथेनॉलचे खरेदी दर न वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे इथेनॉलचे दर एफआरपीशी संलग्न केल्यास साखर उद्योगाला बळकटी येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे..Sugar Industry: साखर उद्योगाकडे ‘जीडीपी’चा तीन टक्के वाटा उचलण्याची क्षमता .केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी देशातील साखरेचे किमान विक्री मूल्य (एमएसपी) प्रति किलो ४१ रुपये करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना वाढीव उत्पादन खर्च व थकित देणी भागविण्याची समस्या सोडविता येईल, तसेच कर्ज प्रक्रिया सुलभ होईल, असे पत्रात नमूद केले आहे..२०१८-१९ मध्ये प्रति टन २७५० रुपये असलेल्या एफआरपीत वाढ होऊन ती २०२५-२६ मध्ये ३५५० रुपये झाली आहे. परंतु साखरेचे किमान विक्री मूल्य प्रति किलो ३१ रुपयांवर स्थिर आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, इस्मा, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघानेदेखील साखरेचे किमान विक्री मूल्य ४०-४१ रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केलेली आहे..‘निर्यातीसाठी मुदतवाढ हवी’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून सध्या शिल्लक असलेल्या साखरेच्या निर्यातीचा कोटा वापरण्यासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. देशात निर्यातीसाठी यंदा अतिरिक्त राहणारी किमान ८५ लाख टन साखर उपलब्ध असेल. मुदतवाढीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, ‘विस्मा’नेही असेच मुद्दे मांडलेले आहेत, असे या पत्रात नमूद केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.