Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Import: कापूस आयात वाढून १२ लाख गाठींवर पोचली; निर्यात ७ लाख गाठींच्या दरम्यान स्थिरावली

Cotton Market: देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने २ लाख गाठींची वाढ केली. यंदाचे उत्पादन ३०४ लाख गाठी आहे. चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशातून कापूस निर्यात केवळ ७ लाख गाठी झाली.

Anil Jadhao 

Pune News: देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने २ लाख गाठींची वाढ केली. यंदाचे उत्पादन ३०४ लाख गाठी आहे. चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये देशातून कापूस निर्यात केवळ ७ लाख गाठी झाली. तर आयात १२ लाख गाठींवर पोचल्याचेही सीएआयने म्हटले आहे. हंगामातील उत्पादनाचे अंदाज वाढवले तरी वापर, आयात-निर्यातीचा अंदाज कायम ठेवण्यात आला.

काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने नुकतीच आपल्या सर्व राज्यातील भागधारकांची बैठक घेतली. या बैठकीत उत्पादन, वापर, आयात आणि निर्यातीची चर्चा करण्यात आली. आतापर्यंत बाजारात दाखल झालेल्या कापसावरून तेलंगणाच्या उत्पादनात तब्बल ६ लाख गाठीने वाढ झाल्याचे सीएआयने म्हटले आहे. तेलंगणात यंदा ४२ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज आहे. तर उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमधील उत्पादनात ३.५ लाख गाठींची कपात करण्यात आली. तसेच इतर राज्यातील उत्पादनात काहीसे वाढ-कपातीसह देशातील उत्पादनाचा अंदाज २ लाख गाठींनी वाढवण्यात आला. देशातील उत्पादनाचा अंदाज पुर्वीच्या ३०२ लाख गाठींवरून ३०४ लाख गाठी करण्यात आला. 

भारतात यंदा कापसाची आयात वाढण्याचा अंदाज हंगामाच्या सुरुवातीपासूनच व्यक्त करण्यात आला. गेल्या हंगामात भारताने कापसाची निर्यात जास्त केली होती तर आयात कमी केली होती. गेल्या हंगामात भारताने २८ लाख गाठी कापूस निर्यात केली होती. तर आयात १५ लाख गाठी होती. पण यंदा आयात जास्त होण्याचा अंदाज आहे. भारत यंदा २५ लाख गाठी आयात करेल आणि १८ लाख गाठी निर्यात करेल, असा अंदाज सीएआयने व्यक्त केला. 

आयात-निर्यात

सीएआयाने देशातील आयात आणि निर्यातीचा डिसेंबरपर्यंतचा आकडा जाहीर केला. भारतात चालू हंगामाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात १२ लाख गाठी कापूस आयात झाला. तर ७ लाख गाठी कापसाची निर्यात झाली. म्हणजेच यंदा निर्यातीपेक्षा आयात जास्त आहे.

बाजारातील आयात

देशातील बाजारात आतापर्यंत जवळपास ५८ टक्के कापूस शेतकऱ्यांनी विकल्याचे दिसते. देशातील बाजारात आतापर्यंत १७८ लाख गाठीच्या दरम्यान कापूस आला. देशातील बाजारता सध्या रोज दीड लाख गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे. 

देशातील बाजारभाव

देशातील बाजारभाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. बाजारातील आवक आणि मर्यादीत उठाव यामुळे दरावर दबाव आला आहे. सध्या कापूस ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. त्यामुळे कापसाच्या भावातही काहीसे चढ उतार येऊ शकतात, असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT