Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Futures Ban Extension: सात शेतीमालाचे वायदे राहणार बंदच ; वायदेबंदीला एक वर्षाची मुदतवाढ

Futures Trading Ban: शेतीमालाच्या वायदेबाजारावर सरकारने आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यामुळे सोयाबीन, हरभरा, गहू, मुग, मोहरी, कच्चे पाम तेल आणि बिगर बासमती तांदूळ यांचे वायदे ३१ मार्च २०२६ पर्यंत बंद राहतील.

Anil Jadhao 

Pune News: शेतीमाल बाजारात सध्या बहुतांशी मालाचे भाव मंदीत आहेत. या परिस्थितीत शेतकरी, व्यापारी, आयात आणि निर्यातदारांसाठी वायदेबाजार फायद्याचा ठरू शकतो. पण सरकारने सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, मोहरीसह मोहरीतेल आणि मोहरीपेंड, कच्चे पाम तेल, हरभरा, गहू, बिगर बासमती तांदूळ तसेच मूग या शेतीमालांच्या वायदेबंदीला एक वर्षाच मुदतावाढ दिली आहे. म्हणजेच या शेतीमालांचे वायदे ३१ मार्च २०२६ पर्यंत बंदच राहतील.

सेक्यूरिटिज् अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने सोमवारी (ता.२४) वायदेबंदीला मुदतवाढ दिल्याचा आदेश काढला. केंद्राने प्रथम डिसेंबर २०२१ मध्ये वायदेबंदी केली होती. सुरुवातीला वायदेबंदी डिसेंबर २०२२ पर्यंत होती. मात्र वायदेबंदीला मुदतवाढ देत नंतर डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आली. त्यानंतरही मुदतवाढ देत डिसेंबर २०२४, ३१ जानेवारी २०२५, ३१ मार्च २०२५ अशी मुदतवाढ देण्यात आली.

आता तर सरकारने एक वर्षाने मुदतवाढ दिली. आता ३१ मार्च २०२६ पर्यंत वायदेबंदी असणार आहे. सोयाबीनसह सोयातेल आणि सोयापेंड, मोहरीसह मोहरीतेल आणि मोहरीपेंड, कच्चे पाम तेल, हरभरा, गहू, बिगर बासमती तांदूळ तसेच मुगाचा यात समावेश आहे. नुकतेच सरकारने वायदेबंदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.

सरकारने वायदेबंदी करताना वायद्यांमुळे बाजारभावात अवास्तव चढ उतार होतात, असा दावा केला होता. मात्र वायदेबंदीनंतरही सोयाबीन, मोहरी, पामतेल, हरभरा, गहू, तांदूळ आणि मुगाच्या भावात मोठे चढ उतार आले. या शेतीमालांच्या भावाने मागील चार वर्षात उच्चांकी दरही दाखवला आणि निचांकी दरही दाखवला. मग सरकार म्हणते त्याप्रमाणे वायद्यांमुळे जर दरात अवास्तव चढ उतार आले असते तर वायदेबंदीनंतर भावात मोठी तेजी आणि मंदी यायला नको होती. पण तेजी-मंदी आली, म्हणजेच सरकारचा दावा खोटा आहे, असे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

सध्या बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा १ हजार रुपये कमी भाव मिळत आहे. गव्हाचे भाव कमी झाले, हरभरा भावही पडले आहेत, मुगाचा भावही दबावातच आहे. कारण या पिकांचा पुरवठा वाढला. सरकार एकीकडे मात्र बाजार सुधारणांच्या गप्पा करते आणि दुसरीकडे वायदे बाजार चालू देत नाही, अशी टिका शेतकऱ्यांनी केली. आयआयटी मुंबई आणि इतर काही संस्थांनी केलेल्या अभ्यासातून हेच सिध्द झाले की, शेतीमालाच्या बाजारभावात मोठे चढ उतार वायद्यांमुळे आले नाही तर त्या शेतीमालाचे मागणी आणि पुरवठ्याचे समिकरण बदलले म्हणून आले.

शेतकऱ्यांना फायदा काय?

वायदेबाजारामुळे शेतकऱ्यांना भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यास मदत होते. त्याआधारे शेतीमालाची विक्री केव्हा करायची? याचा निर्णय घेण्यास मदत होते. शिवाय शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा मोठे शेतकरी वायदेबाजारात व्यवहार करून दर जोखिम व्यवस्थापनही करू शकतात. मंदीच्या काळात असे पर्याय असणे आवश्यक आहे. आर्थिक पाहणी अहवालातही शेतीमाल बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी वायदेबाजारासारख्या साधनांचे अप्रत्यक्ष समर्थन करण्यात आले होते.

देशातील महागाई आणि जागतिक पातळीवरील समस्या लक्षात घेऊन सरकारने वायदेबंदीला मुदतवाढ दिली. सरकार महागाईवरून जोखिम घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. परंतु आयआयटी मुंबई आणि इतर काही अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे की, वायद्यांमुळे भावात मोठे चढ उतार होत नाही तर मागणी आणि पुरठ्याच्या असमतोलातून होतात.
अजय केडिया, संचालक, केडिया अॅडव्हायजरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy : बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना

Atal Pension Yojana : आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

ITI Modernization : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

Hybrid Calves Crisis : संकरित गाईंची नर वासरे झाली नकोशी

Dam Water Discharge : पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील 19 धरणांतून विसर्ग

SCROLL FOR NEXT