Cotton Market  Agrowon
ॲग्रोमनी

Cotton Market : कापसाऐवजी पाॅलिस्टरचा वापर का वाढला?

Team Agrowon

Cotton Rate Update : देशातील उद्योगांची कापूस वापर क्षमता मागील काही वर्षांपासून वाढली आहे. गुंतवणुकदारांनी उद्योगांचा विस्तार केला. त्यामुळं भारताचा कापूस वापर वाढला. पण या उद्योगांना आता कापूस टंचाईचा सामना करावा लागतोय.

देशातील घटत्या उत्पादनामुळं कापूस टंचाई (Cotton Shortage) निर्माण होऊन दरही जास्त आहेत. म्हणून उद्योगांनी आता कापसाऐवजी पाॅलिस्टरचाही वापर सुरु केला.

भारत कापूस उत्पादनात जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तसचं भारताचा कापूस वापरही मोठा आहे. जागतिक कापूस बाजारात भारताचे महत्व मोठे आहे. पण देशात मागील पाच वर्षांपासून कापूस उत्पादनात सतत घट दिसून येत आहे.

यासाठी मुख्य कारण म्हणजे कापूस शेतीसाठी लागणारे तंत्रज्ञान अद्यावत नसणे हे आहे. बीजी २ हे वाण कीड-रोगांना बळी पडतंय. बीटी बियाण्याचे हे वाण आता कालबाह्य होतंय.

यामुळं उत्पादन सतत घटत आहे. मागील दोन वर्षांपासून तर उत्पादन देशातील वापरापेक्षा कमी होतंय. म्हणून भारताची कापूस आयात सतत वाढतेय.

देशातील कापूस उत्पादन घटल्यामुळं उद्योगांना तुटवडाही जाणवतोय. कापूस आयात करायची म्हटलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढतात. त्यामुळं कापसाचे भाव वाढतात. देशात कापूस महाग झाल्यानं कापड उद्योग पाॅलिस्टरकडे वळत आहेत.

देशातील ग्राहक अद्याप पाॅलिस्टरकडे आकर्षित होताना दिसत नाहीत. यामुळं उद्योगानांही अडचणीही येत आहेत.

कापसाचे भाव मागील काही वर्षांपासून वाढत असल्याने पाॅलिस्टरला पसंती मिळाली. मागील हंगामात कापसाचे भाव एक लाख रुपये प्रतिगाठींच्याही पुढे गेले होते. त्यामुळे पाॅलिस्टरचा वापर वाढला होता. कापसामध्ये मिश्रणही वाढले होते.

यंदाच्या हंगामात मात्र कापसाचे भाव निम्म्यावर आले. गाठीचे भाव १ लाख ११ हजार रुपयांवरून ६२ हजार रुपयांवर आले. कापसाचे भाव निम्म्यावर आले तरी उद्योगांची ओरड सुरुच आहे.

कापूस निर्यातदार, सूतगिरण्या, कापड आणि गारमेंट उद्योग सध्याही कापसाचे भाव जास्त असल्याचे सांगत तोटा होत असल्याचे सांगत आहेत. देशातील कापसाचे भाव यंदाही आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा अधिक आहेत. याचा फटका बसत असल्याची तक्रारही उद्योगांकडून केली जातेय.

सुतगिरण्यांना सध्या फायदा होत नाही आणि अनेक सुतगिरण्या तोट्यात काम करत असल्याचं उद्योगांकडून सांगण्यात येत. पण पाॅलिस्टरचा वापर करण्यात मर्यादा आहेत. पाॅलिस्टरच्या कपड्यांना मागणी आल्यानंरच उत्पादन वाढवता येईल. तसेच कापसात पाॅलिस्टरचा वापर वाढविण्यासाठी सरकारनेही धोरणा आखावं अशी मागणी केली जाते.

कापसाऐवजी पाॅलिस्टरचा वापर वाढल्यास कापूस दरावर याचा परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, अद्यावत बियाणे देऊन कापूस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे.

उत्पादन कमी झाल्यास शेतकऱ्यांचाही तोटा होतो. त्यामुळं शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळायला हवा. म्हणून पाॅलिस्टरचा वापर वाढविण्याऐवजी देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी काम करावे, असं जाणकारांच म्हणणं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT