Chilli Market
Chilli Market Agrowon
ॲग्रोमनी

Chilli Market : लाल मिरचीला दराचा ठसका; उत्पादन घटल्याने तेजी कायम राहणार

Anil Jadhao 

Chilli Rate : देशात यंदा मिरची उत्पादन (Chilli Production) घटले. गेल्या वर्षीप्रमाणं यंदाही तेलंगणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरची पिकावर तुडतुड्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. उत्पादकता जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याचे शेतकरी सांगत आहेत.

दुसरीकडे मिरचीला मागणी आहे. त्यामुळं सध्या मिरचीचे दर तेजीत आहेत. यंदा उत्पादन कमी असल्यानं बाजारातील आवक वाढल्यानंतरही दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.

देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे. महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होते. मिरची पिकावर यंदाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवला. त्यामुळं यंदाही उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. पण यंदा उत्पादन १० ते १२ क्विंटलपर्यंतच स्थिरावल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच अनेक भागातील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांपर्यंत माल विकला आहे.

देशात गेल्या हंगामातही मिरची उत्पादन घटले होते. त्यामुळं सध्या गोदामांमध्ये शिल्लक साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शिल्लक मिरचीचा स्टाॅक यंदा ९० टक्क्यांपर्यंत कमी आहे. यंदाही उत्पादन घटलं. त्यामुळं सध्या मिरचीचे दर तेजीत आहेत.

शेतकऱ्यांनाही यंदा चांगला दर मिळत आहे. पण उत्पादन घटल्यानं घटल्यानं शेतकऱ्यांना फार नफा होताना दिसत नाही.

मिरचीला सध्या चीन आणि बांगलादेशमधून मागणी आहे. सध्या नव्या मालाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे अनेक वाणांचे दर तेजीत आहेत. त्यामुळे अनेक आयातदार नवा माल बाजारात येण्याची वाट पाहत आहेत.

तेलंगणात दरात तेजी

देशात तेलंगणात सर्वाधिक ४ लाख हेक्टरवर मिरची लागवड झाली. देशातील एकूण क्षेत्रापैकी २२ टक्के तेलंगणा आहे. तर ३८ टक्के उत्पादन होते. यंदा तेलंगणात ७.२० लाख टन मिरची उत्पादन झाले. पण तेलंगणातच दर तेजीत आहेत.

तेलंगणातील बाजारात तेजी वाणाच्या मिरचीला सरासरी १८ हजार ते २३ हजार रुपये दर मिळत आहे. गेल्या हंगामात हाच भाव १७ हजार रुपयांच्या दरम्यान होता. वंडर हाॅट वाणाचे दर सध्या ३८ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोचले.

गेल्या हंगामात हाच भाव २९ हजार रुपये होता. तर युएस ३४१ वाणाने २६ हजारांचा टप्पा गाठला. मागील हंगामात हाच भाव २१ हजार रुपये होता. पुढील काळात बाजारात मिरचीची आवक वाढेल. पण दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.

यंदा तेलंगणात उत्पादन घटले. राज्यातही उत्पादन काहीसे कमी आहे. सध्या गेल्यावर्षीचा स्टाॅक खूपच कमी आहे. त्यातच मिरचीला चांगाल उठाव मिळतोय. त्यामुळे मिरचीला चांगाल दर आहे. पुढे आवक वाढली तरी मिरची दरातील तेजी कायम राहू शकते.
सचिन जैन, मिरची व्यापारी, नंदूरबार
गेल्या हंगामात मिरचीला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळं यंदा लागवड कमी झाली. त्यातच पाऊस आणि तुडतुड्यांमुळे उत्पादन घटले. उतारा गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास निम्माच आला.
राहूल माळी, शेतकरी, शहादा, नंदूरबार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT