
देशातील महत्वाच्या मिरची उत्पादक (Chilli producer) राज्यांमध्ये यंदा पिकाला पावसाचा फटका बसला. त्यामुळे मिरचीचे उत्पादन (Chilli Production) घटण्याचा अंदाज आहे.
तर सध्या बाजारातील लाल मिरचीची (Red Chillo Arrival) आवक जवळपास ३० टक्क्यांनी घटली. मग सध्या बाजारात लाल मिरीचीला काय दर मिळतोय? मिरचीचे दर (Red Chilli Rate) वाढतील का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.
1. सोयाबीनचे दर कायम
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरुच आहेत. काल शेवटच्या टप्प्यात दर कमी झाल्यानंतर आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली.
तर देशातील बाजारातही दरात किंचित चढ उतार होत आहेत. मात्र सरासरी दरपातळी आजही कायम आहे. देशात आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
सोयाबीनचे दर पुढील काही दिवस या दरपातळीवर राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बााजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. कापूस बाजारात चढ उतार
देशातील बाजारात आज कापसाचे दर काही ठिकाणी वाढले. मात्र सरासरी दरपातळी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान कायम होती.
आज बाजारातील कापूस आवक मर्यादीत राहीली. त्यामुळं कापसाचे दर टिकून आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दरातील चढ उतार सुरुच आहेत.
सध्या कापसाचे दर मागील महिन्याच्या तुलनेत वाढलेले आहेत. त्यामुळं शेतकरी आणखी दरवाढीची वाट पाहत आहेत.
शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
3. काकडीच्या दरात तेजी
राज्यातील बाजारात सध्या काकडीची आवक कमी झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर हे बाजार वगळता इतर बाजारांमधील काकडीची आवक २० क्विंटलपेक्षा कमीच आहे.
त्यामुळं काकडीचे दर तेजीत आहेत. सध्या राज्यातील बाजारात काकडीला सरासरी १ हजार ७०० ते २ हजार रुपये दर मिळतोय.
काकडीचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
4. कारल्याची आवक मर्यादीत
कारल्याला सध्या चांगला दर मिळतोय. बाजारात कारल्याची आवक कमी आहे. त्यामुळं सध्या कारल्याला प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळतोय.
मागील काही दिवसांपासून कारल्याचा हा दर टिकून आहे. तसंच पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज कमीच आहे.
त्यामुळं कारल्याचे दर आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
5. देशातील बाजारात सध्या लाल मिरचीची आवक घटली आहे. देशात मिरची उत्पादनात आंध्र प्रदेश आघाडीवर आहे. तसेच तेलंगणा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घतले जाते.
तर महाराष्ट्रात मिरची उत्पादन काही जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. मात्र यंदा दक्षिण भारतात मिरची पिकाला पाऊस आणि कीड रोगांचा फटका बसला. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात यंदा मर रोग आणि तुडतुड्यांचा मिरची पिकाला मोठा फटका बसला.
त्यामुळं सध्या बाजारात होणारी मिरची आवक जवळपास ३० टक्क्यांनी घटली आहे. देशात २०२०-२१ या वर्षात मिरचीचे जवळपास २० लाख टन उत्पदान झाले होते.
तर २०२१-२२ च्या हंगामात उत्पादन १७ लाख टनांवरच स्थिरावल्याचं अपेडाच्या माहितीवरून स्पष्ट झाले. महाराष्ट्रातही महत्वाच्या मिरची बाजारात सध्या आवक कमीच दिसत आहे. दुसरीकडे लाल मिरचीला सध्या चांगली मागणी आहे.
त्यामुळं लाल मिरचीला मिळणारा मिळणारा दर चांगला आहे. सध्या देशातील बाजारात लाल मिरचीला व्हरायटीनुसार प्रतिक्विंटल १५ हजार ते २७ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा चालू आर्थिक वर्षात लाल मिरचीचे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे.
मात्र मागणी कायम आहे. त्यामुळे लाल मिरचीच्या दरातील तेजी पुढील काळातही कायम राहण्याच अंदाज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.