Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : चाळीत साठवलेल्या कांद्याची ४० टक्क्यांवर सड

एकीकडे शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कांदा साठवला, मात्र त्यास उत्पादन खर्च वसूल होईल इतका भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे सड होऊन माल संपुष्टात येत आहे तर दुसरीकडे दर नसल्याने तो चाळीतच ठेवल्याने नुकसान वाढत आहे.

मुकूंद पिंगळे

नाशिक : गत रब्बी उन्हाळ कांदा हंगामात (Rabi Onion) जिल्ह्यात २ लाख १६ हजार हेक्टरवर लागवडी (Onion Cultivation) होत्या. त्यात ५० हजार हेक्टरने क्षेत्र वाढल्याचे दिसून आले. मात्र कांदा काढणीपश्चात उत्पादनावर (Onion Production) परिणाम दिसून आला. एकरी उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले. त्यामुळे सुरुवातीला दरवाढीच्या आशेने प्रतवारी करून कांदा साठवला. (Onion Storage) मात्र त्यात ४० टक्क्यांवर सड (Onion Rotted) होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

एकीकडे शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कांदा साठवला, मात्र त्यास उत्पादन खर्च वसूल होईल इतका भाव मिळत नाही. त्यामुळे एकीकडे सड होऊन माल संपुष्टात येत आहे तर दुसरीकडे दर नसल्याने तो चाळीतच ठेवल्याने नुकसान वाढत आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेनुसार खरीप हंगामापासून टप्प्याटप्प्याने कांदा विकला. मात्र त्यांना अपेक्षित परतावा मिळाला नसल्याची स्थिती आहे.

शेतकऱ्यांचा निम्मा कांदा विकला गेला मात्र तोही तोट्यात असे विक्री व मोबदल्याचे व्यस्त चित्र आहे. उरलेला कांदा दोन पैसे देऊन जाईल अशी अपेक्षा असताना डोळ्यासमोरच कांदा काळपट पडून त्याची टरफले निघून जात आहेत. तर काही कांदा चाळीमधून अक्षरशः काळे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कांद्याचा साठा संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

एकरी कांद्याच्या उत्पादनात अपेक्षित उत्पादन हाती आलेले नव्हते. त्यात मालाला आकार नाही; गोल्टी व चिंगळीचे प्रमाण अधिक व रंग नसल्याने तुलनेत आकर्षकपणा कमी होऊन मालाची दुय्यम प्रतवारी माल अधिक होता. असे असताना कांदा साठवणूक करताना कांदा निवडून चाळीत साठवला. त्यास ४ ते ५ महिने होऊन गेले आहेत. आता बाजारात मिळणाऱ्या दरात उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने आर्थिक कोंडी झाली. त्यातच सड वाढल्याने फटका बसत आहे.

निफाड, येवला, सिन्नर, सटाणा, कळवण, मालेगांव, देवळा, चांदवड, नांदगाव, दिंडोरी या भागात नुकसान वाढते आहे. काही शेतकऱ्यांचे जवळपास ९० टक्के नुकसान आहे. त्यामुळे साठवलेला कांदाही सडत असल्याने नुकसान सोसावे लागत आहे. तर कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा त्यातही खर्च करून अपेक्षित दर मिळत नसल्याने अर्थकारण कोलमडले आहे.

शेतकरी म्हणतात, पुन्हा उभे कसे राहायचे

कांद्याला गुणवत्तेअभावी बाजारात उठाव नाही. प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, मजूरटंचाईमुळे उत्पादनखर्च दुपटीने वाढूनही उत्पन्न निम्म्यावर आले आहे. त्यामुळे उत्पन्नाचे गणित कसे जुळवायचे ५० टक्के नुकसान आहे. असाच जर पाऊस चालू राहिला तर अजून खराब होतील, पुन्हा कसे उभे राहायचे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

साठवलेल्या कांद्याला भावाअभावी फटका आहे. तर साठवलेला कांदा ७० टक्के नुकसान झाले आहे. प्रतवारी खुपच खालावली आहे. शासनाने काही हस्तक्षेप करून कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
शिवाजीराव पवार, कांदा उत्पादक शेतकरी, वाखारी, ता. देवळा
जास्त पाऊस आणि दमट हवामानामुळे ५० टक्के कांदा चाळीत सडला असून शिल्लक कांदा अजून विक्रीपर्यंत किती राहील यांची शाश्वती नाही. येणाऱ्या काळात कितीही भाववाढ झाली तरी नुकसान भरून निघणार नाही.
ज्ञानेश्वर कांगुणे, कांदा उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT