उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. 
कृषी पूरक

उन्हाळ्यात जनावरांमध्ये दिसतात उष्माघाताची लक्षणे !

उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात जनावरांना हिट स्ट्रोक होण्याचा धोका सर्वाधिक असतो. याचा सरळ परिणाम हा दूध उत्पादनावर होत असतो.

Roshani Gole

पशुपालन व्यवसाय करत असताना तिन्ही ऋतूतील बदलानुसार व्यवस्थापनात बदल करणे गरजेचं ठरते. उन्हाळा सुरु झालाय, सध्या अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचे इशारा देण्यात आला आहे. अति उष्णतेमुळे माणसाप्रमाणे जनावरांमध्येही उन्हाळ्यात रक्तस्त्राव होत असतो. उन्हाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात जनावरांना हिट स्ट्रोक होण्याचा धोका सर्वाधिक असतो. याचा सरळ परिणाम हा दूध उत्पादनावर होत असतो.


उन्हाळ्यात जनावरांमध्ये दिसून येणारा रक्तस्त्राव हा संकरीत जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात असतो. यात जनावरांच्या नाकातून गडद लाल रंगाचे रक्त वाहते. उन्हाळ्यात जनावरांना पिण्याचे स्वच्छ, थंड पाणी द्यावे. नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास डोक्यांवर थंड पाणी ओतावे. रक्तस्त्राव थांबत नसल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्त्व-क आहारातून द्यावे.

सूर्याच्या प्रखर किरणामुळे जनावरे उष्माघाताला बळी पडण्याचे प्रमाण वाढते. उष्माघातामुळे जनावरांच्या शरीराची कातडी कोरडी पडते. खाद्य खाण्याचे प्रमाण कमी झाल्याने, जनावरे थकून जातात. दूध उत्पादनात घट दिसून येते. यावर उपाय म्हणून जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे. गोणपाट ओलसर करून जनावरांच्या डोक्यावर किंवा पाठीवर ठेवावे. गोठ्यातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात. गोठ्यातील तापमान जास्त असल्यास जनावरांना मोकळ्या सावलीच्या जागी बांधावे. अशा ठिकाणी चाऱ्याची आणि पाण्याची सोय करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

Genome Paddy Variety : भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या जिनोम संपादित भात वाणाची काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT