Fish Farming
Fish Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Fish Farming : माशांना होणाऱ्या आजारांवर उपचार

टीम ॲग्रोवन

किरण वाघमारे

निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त मत्स्यबीज (Fish Seed) संचयन केल्यास किंवा त्यांना नीट आहार (Fish Feed) न दिल्यास त्यांना विविध आजार होतात. उत्पादन खर्चाच्या १० ते १५ टक्के नुकसान होते. मासे हे त्यांच्याकडे असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर आजाराशी (Fish Disease) लढत असतात. परंतु तलावातील विविध बाबी जसे की दूषित पाणी इत्यादीमुळे यावर मर्यादा येते. विविध आजारांमुळे अल्पावधीत बरेच मासे मरताना दिसतात. त्यांची वाढ कमी होते, माशांवर खुणा दिसतात किंवा त्यांच्या दिसण्याच्या किंवा पोहण्याच्या पद्धतीत बदल होतो.

तलावातील माशांना आजार होण्यापूर्वीचे संकेत ः

विविध आजारांमुळे माशांवर लक्षणे दिसतात. कुपोषण, कमकुवत शरीर वाढ, अंगावर हवेचे/पाण्याचे बुडबुडे येणे, तलावाच्या वरच्या भागांत फिरणे, अक्षेपार्ह हालचाल, शेपटीने पाणी आदळणे, घट्ट ठिकाणांवर अंग घासणे, असामान्य हालचाल (संथ गती) व पंख व शरीरात फरक दिसणे, शरीराचे किंवा पंखाचे रंग जाणे, शरीरावर जास्त प्रमाणात चिकट पदार्थ आणि शरीरावर आणि कल्यावर रक्त स्त्राव ही आजाराची लक्षणे आहेत.

आजारी आणि निरोगी माशांमधील फरक ः

--------------------------------------आजारी---------------------निरोगी

क्रिया/हालचाल ----------हळू हळू पाहणे/ आळशी प्रतिसाद-----सक्रियपणे पोहणे/ तीक्ष्ण आणि प्रतिक्रियाशील

शरीराचे रंग--------कंटाळवाणा/ गडद किंवा रंगरहीत---------चमकदार आणि तकतकीत

शरीर पृष्ठभाग---------पांढऱ्या रंगाचे पॅचेस पडणे --------सरळ असणे

शरीराचा आकार---------पातळ---------सामान्य

खाद्य सेवन----------खराब भूक/ खाद्य न खाणे-----------चांगली भूक उत्साहीपणे खाद्य सेवन

अवयव---------वेगवेगळ्या अवयवाचे नुकसान दिसून येते.-----अंतर्गत अवयव निरोगी व सामान्य असतात.

वातावरणाशी निगडित आजार ः

पाण्याच्या गुणवत्ता व्यवस्थापनाअभावी मासे आणि कोळंबीच्या वाढीवर परिणाम होतो. त्याचे दृश्य परिणाम पुढील प्रमाणे दिसून येतात.

a) प्राणवायूची कमतरता.

b) आम्लता निर्देशांकात किंवा कर्ब वायूचे वायू प्रमाणात वाढ.

c) शरीरात अमोनिया आणि शरीराबाहेर टाकावयाची द्रव्ये साठणे.

d) हायड्रोजन सल्फाइड वायूची पाण्यातील पातळी वाढणे.

e) प्राणवायू व नायट्रोजन वायूची पाण्यातील पातळी वाढणे.

f) कीटकनाशकांचे प्रदूषण

g) वनस्पती प्लवंगात वाढ.

तलावातील मासे वेगळ्या पद्धतीने वागत असल्यास तपासणी ः

माझे मासे वेगळ्या पद्धतीने वागत आहेत

खाद्य व पाणी तपासणी करा

संसर्गाची तपासणी करा

पाणी

खाद्य

परजीवी

जिवाणू

बुरशी

विषाणू

ऑक्सिजन कमी आहे का?

सामू ९ पेक्षा अधिक किंवा ६ पेक्षा कमी आहे का?

पाण्याची प्रत खराब झाली का?

रंग बदलला

खाद्य नवीन आहे का?

खूप कालावधीपासून साठवणूक केलेले आहे का?

काही भाग खाण्यास अयोग्य आहे का?

मासे लहान दिसतात का?

माशांचे कल्ले किंवा शरीराच्या पृष्ठभागावर काही चिकटलेले आहे किंवा राहत आहेत का?

मासळीच्या आत जीव दिसत आहे का?

विचित्रपणे पोहणे

आपण जिवाणू पाहू शकत नाही. ते शरीरातील द्रवांमध्ये राहतात. तुम्हाला फक्त लक्षणे दिसतात.

अल्सर, रक्तरंजित डाग किंवा धुके असलेले डोळे किंवा चिंधलेले पंख आहेत का?

अंगावर काही पांढरे ठिपके/पॅच आहेत का?

त्वचेवर किंवा जखमांवर कापसासारखे धागे आहेत का?

आपण विषाणू पाहू शकत नाही. ते शरीराच्या पेशी मध्ये राहतात.तुम्हाला फक्त लक्षणे दिसतात.

मासे मरण्याचे प्रमाण अचानक वाढले?

विचित्र शरीर आकार किंवा रंग?

आजार होऊ नये यासाठी उपाययोजना ः

पाणी ः

मत्स्य मरतुक अनेकदा तलाव किंवा हॅचरीत होणाऱ्या खराब व्यवस्थापनामुळे दिसून येते. तलावाचे पर्यावरण मृत्युदर व रोगराई विशेषत: तलाव, हॅचरीत वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. तलावातील मत्स्य मरतुक आणि सांसर्गिक आजार होण्यामागे पाण्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे.

पाण्याची गुणवत्ता ः

अ.क्र---बाबी---श्रेणी

१---पाण्याचा सामू (pH)---७.५-८.५

२---विद्राव्य प्राण वायु (DO)---> ५ पीपीएम

३---पाण्याचे तापमान ---२५-३० अंश सेल्सिअस

४---अल्कलीनिटी ---७५-१७५ पीपीएम

५---जडता --- ७५-१५० पीपीएम

उपाययोजना ः

१) ऑक्सिजन कमी झाल्यास ः स्वच्छ पाणी बदलावे. काठी / बांबूने पाण्यावर मारावे. तलावाच्या चहू बाजूने तुषार सिंचनाने पाणी तलावात पडू द्यावे. पोटॅशियम परमॅंगनेट वापर करावा.

२) सामू जास्त किंवा कमी ः पाण्यात चुना मिसळावा. (२५० किलो प्रति हेक्टर)

३) प्रदूषण ः पाण्यात काही घाण झाली आहे का ते पहावे. ती घाण काढावी.

४) एकपेशीय वनस्पती ः लहान वनस्पती मासे खातात. हे तयार होण्यासाठी आपण खत घालतो. पण मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार होणे अयोग्य असते. यामुळे मासे मरतात. त्यामुळे शेवाळ स्वच्छ करावे.

खाद्य ः

१) नवीन खाद्य ः शक्यतो ताजे खाद्य वापरण्याचा प्रयत्न करावा. मुदत संपलेले खाद्य वापरू नये.

२) खाद्य काळजीपूर्वक साठवा ः खाद्य कोरडे आणि उन्हापासून दूर ठेवावे.

३) खराब खाद्य वापरू नका ः जर खाद्यावर पांढरे धागे असतील तर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे. असे खाद्य वापरू नये.

४) पुरेसा आहार द्या ः माशांना नैसर्गिक खाद्य आणि तांदळाचा कोंडा आणि तेलकट खाण्यासाठी पुरेसे आहे याची खात्री करावी.

सामान्य आजाराची कारणे आणि उपचार पद्धती ः

परजीवीमुळे होणारे आजार ः

१) वेगळ्या पद्धतीने वागणाऱ्या माशांकडे काळजीपूर्वक पाहावे.

२) त्वचेकडे, गिल्सच्या आत आणि शरीराच्या आत पाहावे.

३) तुम्हाला शरीरावर काही चिकटलेले किंवा फिरताना किड्यासारखे किंवा खेकड्यासारखे काही दिसत आहे का? माशांवर खूप चिखल आहे का? त्वचेवर अल्सर आहेत का? हे तपासावे.

फिश लॉस ः

- शरीराला चिकटतो किंवा त्वचेवर फिरतो.

- डोळ्याला दिसतात.

- तलावांमध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थांसह अनेक समस्या निर्माण करतात.

- हे माशाचे रक्त पितात. मोठे अल्सर होतात. मासे शरीरावर भरपूर चिकट स्राव तयार करतात.

- मासे आळशी होतात. खाद्य खात नाहीत.

अँकर वर्म ः

- कल्ले आणि शरीराशी चिकटतो.

- माशाच्या अंगावर प्रमाणात गडद, धाग्यासारख्या शेपट्या दिसतात.

- कटला माशासाठी मोठी समस्या आहे.

- मासे कमजोर होतात.

उपचार ः

फिश लाऊस आणि अँकर वर्मसाठी माशांना आठवड्यातून एकदा १ मिनीट मॅलेथिऑन (०.२५ मिलि प्रति लिटर पाणी)मध्ये तीन आठवडे अंघोळ घालावी. हे कीटकनाशक असल्याने वापरण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभाग अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे. तलाव स्वच्छ करावा.

फ्लूक्स ः

- हे कल्ले आणि त्वचेला चिटकतात.

- त्वचेवर रक्त आणि पांढरे ठिपके दिसतात.

- सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध तलावांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.

- मत्स्यबीज संवर्धन तलावात बरेच मासे मारतात.

- माशांवर इतर परजीवी प्रादुर्भाव करतात.

उपचार ः

- माशांना २० ते २५ मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फॉर्मेलिनने अंघोळ घालावी. फार्मेलिन विषारी असल्याने याचा वापर करण्यापूर्वी मत्स्य व्यवसाय विभाग अधिकारी किंवा मत्स्यतज्ज्ञांचा सल्ला द्यावा. तलाव स्वच्छ ठेवावा.

परजीवींचा प्रादुर्भाव ः

- हे परजीवी डोळ्यांनी दिसत नाहीत. परंतु आपल्याला त्याची लक्षणे दिसतात.

- शरीरावर पांढरे डाग दिसतात. माशांवर मीठ शिंपडल्यासारखे दिसते.

- हे लहान मत्स्यबीज आणि बोटुकलीवर प्रादुर्भाव करतात.

- माशांच्या शरीरावर वाढतात. नंतर शरीर सोडून तलावाच्या तळाशी जातात. यांची लहान पिले जन्माला येतात आणि मासळीला नुकसान करतात.

- काही परजीवी कल्ले आणि त्वचेचे नुकसान करतात. त्वचेवर रक्त किंवा पांढरे ठिपके दिसतात.

- मासे बारीक दिसतात. काहींना श्‍वास घेण्यास त्रास होतो. मत्स्यबीज आणि बोटुकलींना मारतात.

उपचार ः

- माशांना मिठाच्या द्रावणात १ मिनिटांसाठी अंघोळ द्यावी (बाथटबमध्ये प्रति लिटर पाण्यात २० ग्रॅम मीठ मिसळावे).

जिवाणूमुळे होणारे आजार ः

- दररोज मासे मरत असतील तर जिवाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे, असे समजावे.

कॉटन वूल ः

- डोके, ओठ आणि पंखांवर कापसांसारखे पांढरे डाग दिसतात. नंतर संपूर्ण शरीर झाकतात.

उपचार ः

- पोटॅशिअम परमॅंगनेट २० मिलिग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून या द्रावणात माशांना १५ मिनिटे अंघोळ घालावी.

शेपूट आणि पंख सडणे ः

- पिलांपासून ते मोठ्या मासळीपर्यंतच्या सर्व अवस्थांवर परिणाम होतो.

- शेपूट आणि पंख हळूहळू नष्ट होतात.

उपचार ः प्रादुर्भावीत भागावर कॉपर सल्फेट (५०० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात उपचार करावेत.)

अल्सर ः

- शरीरावर पांढऱ्या गुच्छासारखे चट्टे दिसतात, ज्यामुळे त्वचेला इजा होते आणि गोलाकार, गडद लाल व्रण निघतात.

- तीव्र आजाराने मासे मरतात.

उपचार ः

- तलावाची स्वच्छता करावी. ठरावीक अंतराने चुना वापरावा.

- सात दिवस खाद्यामध्ये ऑक्सीटेट्रासाइक्लिन (२५ मिग्रॅ/किलो) मिसळावे. हे एक प्रतिजैविक आहे.

रक्त विषबाधा ः

- तोंड आणि कल्यावर, गुदद्वाराभोवती आणि पंखांच्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. त्यामुळे लहान मासे मरतात.

उपचार ः

- दहा दिवसांकरिता खाद्यामध्ये ऑक्सीटेट्रासाइक्लिन (५० ते ७० मिग्रॅ/किलो) द्यावे.

- प्रत्येक आठवड्यात तलावाच्या पाण्यात मिथिलीन ब्लू (४ मिलिग्रॅम प्रति लिटर पाणी) टाकावे.

एडवर्ड्स आजार ः

- १ ते ३ दिवसांत तुमचे सर्व मत्स्यजिरे नष्ट होतात.

- कार्प माशामध्ये हा आजार दिसतो.

- मासे फिकट गुलाबी आणि पातळ होतात.

- काही वेळा शरीरावर पिनहेडच्या आकाराचे लालसर ठिपके असतात.

उपचार ः

- आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पाण्याची गुणवत्ता सुधारावी.

बुरशीजन्य आजार ः

कापूस लोकर आजार ः

- अंडी, मत्स्यबीज, बोटुकली आणि मोठे मासे हाताळतेवेळी आणि जाळ्यामुळे झालेल्या जखमांमुळे किंवा त्वचेच्या इतर समस्यांमुळे आजार होतो.

उपचार ः

- संक्रमित अंडी किंवा मासे एक मिलिग्रॅम मॅलाचिट ग्रीन प्रति लिटर पाण्यात मिसळून एक तासापर्यंत अंघोळ घालावी.

- मत्स्यबीजाला २ टक्के मिठाची अंघोळ दिल्यास त्यांच्या कल्यामधून बुरशी बाहेर पडण्यास मदत होते.

ईयूएस आजार ः

- आजार पावसाळ्यानंतर किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीस होते.

- शरीरावर लाल अल्सर होतात. जे संक्रमित होतात.

उपचार ः

- संक्रमित माशांवर तातडीने उपचार करावेत. सात दिवसांच्या आत स्थिती सुधारते.

महत्त्वाची सूचना ः

कोणत्याही आजाराच्या लक्षणाची खात्री झाल्याशिवाय उपचार करू नयेत. आजाराची लक्षणे आणि उपचाराकरिता मत्स्य व्यवसाय विभाग अधिकारी किंवा मत्स्यतज्ज्ञाशी संपर्क साधावा.

आजार होऊ नयेत यासाठी मार्गदर्शक सूचना

अ.क्र---हे करावे---हे करू नये

१---संवर्धनामध्ये उत्तम पाणी वापरावे व पाण्याची गुणवत्ता राखावी---शेवाळ युक्त व काळे पाणी वापरू नये

२---योग्य प्रमाणात व नियमित अंतराने चुन्याचे द्रावण व शेणखताचे द्रावण तलावात शिपांवे---गढूळ आणि वासरहित पाणी वापरू नये.

३---तलाव जंतुनाशक करण्यासाठी अतिरिक्त प्रमाणात चुन्याचा वापर करावा.---पान कोंबडा तलावात येऊ देऊ नये

४---इष्टतम प्रमाणात मत्स्यबीज सोडावे----प्रमाणाबाहेर मत्स्यबीज तलावात सोडू नये.

५---संतुलित आहाराचा वापर करावा---झाड पाला, पक्षी कोंबडी इ. भाग तलावात टाकू नये.

६---२-३ महिन्यांतून एकदा तलावातील माशांची तपासणी करावी. ----- आजारी मासे खाऊ नयेत.

७---सॅम्पलिंगच्या वेळी संक्रमित, आजारी मासे आढळल्यास बाहेर काढावेत. मत्स्यतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.---

संक्रमित मासे परत तलावात सोडू नयेत. बांधावर टाकू नयेत.

८----सॅम्पलिंगकरिता वाळलेले व निर्जंतुकीकरण केलेले जाळे वापरावे---- संक्रमित तलावात वापरलेले जाळे वापरू नये

९----तलावातील पाण्यात दुर्गंधी होऊन वास येईल असे काही करू नये.---खत व खाद्य जास्त प्रमाणात टाकू नये.

१०---नको असलेले गवत काडी कचरा, पाण वनस्पती, गोगलगायी, बेडूक इ. काढावे, त्यांचा नायनाट करावा.-----

तलावांच्या बांधावर मृत मासे किंवा इ. कीटक टाकू नयेत.

११ - -- एक पीक घेतल्यानंतर जमीन सुकवून तलावाचे निर्जंतुकीकरण (चुना मारणे) करावे ----पक्षी, कुत्री, मांजर, मासे खाणाऱ्या प्राण्यांचा तलावाच्या ठिकाणी प्रवेश टाळावा.

१२---मत्स्यबीज खरेदी शासनाकडून प्रमाणिकरण झालेल्या मत्स्यबीज केंद्रातून करावी. गुणवत्ता प्रमाणित बीज खरेदी करावे. ----नको असलेले व प्रतिबंधित मासे तलावात सोडू नयेत.

१३----जेव्हा पाण्याची गुणवत्ता चांगली असेल आणि तलावात पुरेसे नैसर्गिक खाद्य (प्लवंग) उपलब्ध असेल तेव्हाच बीज सोडावे.---- बिल्चिंग वापरलेले पाणी वापरू नये.

१४----प्रति महिना पाण्याची तपासणी करावी. ---कीटकनाशके वापरलेल्या गोष्टी तलावात धुऊ नयेत.

संपर्क ः किरण वाघमारे, ९८८१६००९५१

(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT