Sitaphal Bahar
Sitaphal Bahar Agrowon
ॲग्रो गाईड

Sitaphal Bahar : सीताफळ बागेत उन्हाळी बहराचे व्यवस्थापन कसे करावे?

Team Agrowon

सीताफळ बागेत (Custerdapple Orchard) उन्हाळी बहार घेताना पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे. उन्हाळी बहर घेताना अधिक तापमान व उष्ण वारे यांचा सामना करावा लागतो. सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते.

उन्हाळी बहरामध्ये (Summer Bloom) आर्द्रता कमी झाल्‍यास फळधारणेवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा चांगली फुले लागतात, मात्र फळधारणा होत नाही. त्यामुळे सीताफळ बागेत उन्हाळी बहर धरताना विशेष काळजी घ्यावी.

उन्हाळी बहर धरताना घ्यायची काळजी

उन्हाळी बहर धरण्यापूर्वी सीताफळ बागेला १५ फेब्रुवारी ते १ एप्रिल दरम्यान ताण दिला जातो.एप्रिल व मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता अधिक असते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बागेला पाणी द्यावे.

त्यानंतरच्या काळात झाडाच्या गरजेनुसार पाणी देण्यास सुरुवात करावी.

सीताफळाची फळधारणा ही बागेतील आर्द्रतेवर अवलंबून असते. उन्हाळी बहरामध्ये आर्द्रता कमी झाल्‍यास फळधारणेवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा चांगली फुले लागतात, मात्र फळधारणा होत नाही. याचे मुख्य कारण बागेतील वाढलेले तापमान आणि कमी झालेली आर्द्रता असते.

ताण देण्याचा काळ संपल्यानंतर बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. बागेत पडलेली काळी पाने, रोगट फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगट फळे गोळा करून नष्ट करावीत.

बहर धरताना पानगळ झालेल्या बागेस पाणी द्यावे. त्यानंतर ७ ते १० दिवसांनी बहराची छाटणी करावी.

बागेची छाटणी करताना जुन्या वाळलेल्या, अनावश्‍यक, दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडाचा मध्यभाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. त्यामुळे पूर्ण झाडास सूर्यप्रकाश मिळेल.

झाडाला सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास फळधारणा कमी होते.

झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी.

आर्द्रता कमी असलेल्या सीताफळ बागेत झाडाजवळ बाजरीसारखे पीक लावावे. यामुळे झाडाजवळ योग्य ती आर्द्रता राखण्यास मदत होते आणि फळधारणा वाढते.

सीताफळ बागेमध्ये अधिक उत्पादनासाठी सेंद्रिय निविष्ठांचा जास्त वापर करावा. यामध्ये शेणखत, शेणस्लरी व गोमूत्र यांचा वापर फायदेशीर ठरतो. शेणस्लरी मुळे जमीन भुसभुशीत होऊन झाडाला जास्त अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. तसेच फुलधारणा चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.

सीताफळाची फुलधारणा एप्रिल महिन्यापासून ऑगस्टच्या शेवटपर्यंत चालते. एका हंगामात सीताफळामध्ये साधारणपणे १५०० ते २ हजार फुले येतात. त्यापैकी १५० ते २०० फळधारणा होते. अशा परिस्थितीत चांगली फळधारणा होण्यासाठी प्रयत्न करावेत.

स्त्रोत : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT