Vegetable Farming  Agrowon
ॲग्रो गाईड

Vegetable Mulching : उन्हाळी भाजीपाल्यातील आच्छादन, पाणी व्यवस्थापन

Vegetable Farming : उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकाचं पाणी कमी असल्यामुळे उत्पादन कमी मिळत, पण बाजारभाव चांगला मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल असतो.

Team Agrowon

Vegetable Water Management : उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकाचं पाणी कमी असल्यामुळे उत्पादन कमी मिळत, पण बाजारभाव चांगला मिळत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे कल असतो.

उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना बाजारात चांगला बाजारभाव मिळतो. बरेच शेतकरी आहे तेव्हड्या पाण्यात कमी जास्त प्रमाणात भाजीपाला लागवड करतात. उन्हाळी हंगामात काकडी, कारली, दोडका, दुधी भोपळा, घोसाळी, भेंडी, गवार, मिरची आणि टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच या हंगामातील लागवडीमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने जास्त असतो. तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास फूलगळ होते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करताना योग्य नियोजन आणि व्यवस्थापण करणे अत्यंत आवश्यक आहे.

पाणी व्यवस्थापन

भाजीपाला पिकाला पाणी देताना जमिनीची सुपिकता, पिकाची वाढीची अवस्था या गोष्टी विचारात घ्याव्यात. ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी दिल्यास कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळू शकते.महत्वाच म्हणजे फुलधारणा ते फळे काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा करावा. शक्यतो सकाळी, संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी पिकाला पाणी द्यावं. भर उन्हात दुपारी पाणी देण टाळाव. त्यामुळे बऱ्यापैकी पाणी वाया जात.

प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर

टंचाई काळात पिकाची पाण्याची गरज पूर्ण करायची असेल तर आच्छादन करण हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. प्लॅस्टिक फिल्म, शेतातील काडीकचरा, गवत, पालापाचोळा यासारख्या घटकांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो. आच्छादन केल्यास झाडांजवळील जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवला जातो. जमिनीत ओलावा टिकवून ठेवला जातो. आच्छादन केल्यामुळे फळ धारणा झाल्यानंतर फळांचा थेट जमिनीशी संपर्क येत नाही. त्यामुळे फळाची प्रत खराब होण्याचा धोकाही टाळला जातो.

याशिवाय जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. तणांचा बंदोबस्त होतो. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये म्हणजे काकडी, कलिंगड, ढेमसे आणि खरबूज तसेच मिरची, वांगी आणि टोमॅटो या पिकांमध्ये आच्छादनाचा वापर फायदेशीर ठरतो. आच्छादनामुळे मुळांची वाढ चांगली होण्यास मदत होते. बीज उगवणक्षमतेत वाढ होते. प्लॅस्टिक आच्छादनामुळे कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढून प्रकाश संश्‍लेषणालाही मदत होते. गादीवाफ्यावर पाणी साचून राहात नाही. रोपांची वाढ व्यवस्थित होते. आंतरमशागतीची कामे कमी होतात. अशा प्रकारे भाजीपाला पिकात योग्य पाणी व्यवस्थापन करुन आच्छादनाचा वापर केल्यास एकंदरीत उत्पादन खर्चात बचत होऊन चांगले उत्पादन मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : श्रावणबाळ योजनेत दिव्यांगांसाठी १ हजार रुपयांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Vidarbha Rains: पश्चिम विदर्भात कुठे दमदार, तर कुठे पावसाची उघडीप

Suhana Khan Farmland: शाहरुखची लेक सुहाना शेतजमीन खरेदी प्रकरणात आली अडचणीत

Solar Spraying Pump Scheme: वीज आणि डिझेलचा खर्च वाचवा; सौर फवारणी पंप खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा

Crop Insurance: खरीप पीक विम्याचे ८ लाख ६० हजार अर्ज

SCROLL FOR NEXT