पिकात जलसंधारणासाठी तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्यासाठी ठराविक ओळीनंतर चर काढावा.
जून महिन्यात पेरलेल्या पिकास पेरणीनंतर ३० दिवसांनी २५ किलो नत्र प्रतिहेक्टरी युरियाद्वारे जमिनीत ओल असताना द्यावे.तणांचा वेळीच बंदोबस्त करावा.शेतात ठराविक अंतरावर जमिनीच्या उतारास आडवे चर नांगराच्या सहाय्याने काढावेत.पेरणीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र (बी.टी. कपाशीसाठी हेक्टरी ६० किलो नत्र) युरियाद्वारे द्यावे.पेरणीनंतर ६० दिवसांनी हेक्टरी ४० किलो (बी. टी. कपाशीसाठी हेक्टरी ६० किलो नत्र) युरियाद्वारे द्यावे.निंदणी व कोळपणी करून पिकातील तणांचा बंदोबस्त करावा. लागवडीनंतर तीन, सहा, नऊ आठवड्यांनी पिकांची निंदणी व कोळपणी करावी.रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट (३० ई.सी.) १ मि.लि. किंवा थायामेथोक्झाम (७० डब्ल्यू.एस.) ०.३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.ठराविक अंतरावर नांगराच्या सहाय्याने उतारास आडवे चर काढावेत.लागवडीनंतर नांग्या पडलेल्या ठिकाणी बियांची टोकण लवकरात लवकर करून घ्यावी.लागवडी वेळी मॅग्नेशियम सल्फेट आणि गंधकाचा वापर केला नसल्यास लागवडीनंतर ३० दिवसांनी २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट अधिक २० किलो गंधक पेरून द्यावा. शेतात पाणी साचू देऊ नये. साचलेले पाणी चर खोदून शेताबाहेर काढावे.पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पोटॅशियम नायट्रेट १ ते १.५ टक्का (१० ते १५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा युरिया किंवा डीएपी १ टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर) याप्रमाणात फवारणी करावी. आच्छादनाचा वापर करावा.सिंचनासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करून अंतरानुसार एका ठिकाणी फक्त दोन जोमदार रोपे ठेवावीत.निंदणी व कोळपणी करुन पिकातील तणाचे नियंत्रण करावे.पेरणीनंतर ४० ते ५० दिवसांनी नत्राचा शेवटचा हप्ता संकरित जातींसाठी ४० किलो प्रति हेक्टरी व अमेरिकन सरळ जाती तसेच देशी जातींसाठी हेक्टरी २५ किलो आणि बी. टी. कपाशीसाठी लागवडीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी ३६ किलो नत्र जमिनीत ओल असताना युरियाद्वारे द्यावा. नत्राची उर्वरित मात्रा ३६ किलो प्रतिहेक्टरी याप्रमाणात जमिनीत ओल असतांना लागवडीनंतर दोन महिन्यांनी युरियाद्वारे द्यावी. युरिया सोबत ६:१ या प्रमाणात निंबाेळी पेडींचा वापर करावा.ठराविक अंतरावर जमिनीच्या उतारास आडवे चर नांगराच्या सहाय्याने काढावे.किडीचे नियंत्रण बागायती कपाशीप्रमाणेच करावे.लागवडीवेळी मॅग्नेशियम सल्फेट आणि गंधकाचा वापर केला नसल्यास लागवडीनंतर ३० दिवसांनी शिफारशीप्रमाणे २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट, अधिक २० किलो गंधक पेरून द्यावे.लागवडीवेळेस नत्र ५० किलो, स्फुरद ५० किलो व पालाश ५० किलो हेक्टरी याप्रमाणात खतमात्रा द्यावी.महिन्यानंतर ५० किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.कांद्याची प्रत व साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी गंधक ३० किलो प्रति हेक्टरी लागवडीवेळी द्यावे.फुलकिडे आणि करप्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० टक्के ई.सी.) १.३ मि.लि. किंवा फिप्रोनील (८० टक्के ) १.५ मि.लि. अधिक मॅंकोझेब (७५ टक्के डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून लक्षणे दिसताच फवारणी करावी.पाऊस नसल्यास ऊस पिकास पाण्याच्या पाळ्या १५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.उसाची पक्की बांधणी केली नसल्यास प्रति हेक्टरी १०० किलो नत्र युरियाद्वारे देऊन पक्की बांधणी करावी. शक्यतो युरिया, निंबोळी पेंंडीबरोबर (६ : १ याप्रमाणात) मिसळून द्यावा.खोड किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्लोरअॅन्ट्रानीलीप्रोल (१८.५ टक्के ) ०.५ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (२० टक्के) २.५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे.काणी रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास रोगग्रस्त झाडांची बेटे मुळासकट खोदून नष्ट करावीत.आंब्याचे खुंट रोपे तयार करण्यासाठी एका खड्ड्यामध्ये ३-४ कोई लावाव्यात.अांब्याचे जागेवरच मृदकाष्ठ कलम करावे.मोसंबीचा मृग किंवा आंबे बहार धरला असल्यास आणि पाऊस समाधानकारक पडला नसल्यास बागेस पाण्याच्या पाळ्या १२ ते १५ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.डाळिंबाच्या प्रत्येक झाडावर ७० ते ८० फळे ठेवावी.पूर्वी लावलेल्या फळझाडांच्या खुंंटावर आलेली फूट काढावी.डाळिंबाचा मृग बहर धरला असल्यास बागेस पाण्याचा ताण पडू देऊ नये. जमिनीच्या मगदूरानुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.मागील वर्षी लावलेल्या फळ बागेतील तूट भरून काढावी.द्राक्षाव्यतिरिक्त सर्व फळझाडांची लागवड करावी.लिंबूवर्गीय फळ झाडांच्या मुख्य खोडावर बोर्डो मलम (१० टक्के) लावावे. संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२-२२९०० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)