Forest Fire  Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department : खालापुरात वणव्यांचा कहर! जंगलसंपत्तीला धोका

Forest Department : सह्याद्री पर्वतरांगेत मानवनिर्मित वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. येथील शेकडो हेक्टर परिसर जळून खाक झाला आहे.

Team Agrowon

Khalapur News : सह्याद्री पर्वतरांगेत मानवनिर्मित वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. येथील शेकडो हेक्टर परिसर जळून खाक झाला आहे. वनविभागाने गाव, वाडीवस्तीवर स्थानिकांच्या मदतीने वणवा प्रतिबंधक उपाययोजनेसाठी कंबर कसली आहे.

मात्र त्‍याचा तितकासा उपयोग होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्‍यामुळे वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी पोलादपूरवासीयांकडून करण्यात येत आहे. खालापूर तालुक्याला दहा हजार हेक्टरचे वनक्षेत्र लाभले आहे; मात्र मागील काही वर्षांपासून या परिसरात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे.

त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीबरोबर वनसंपदेचे नुकसान होत आहे. सुकलेले गवत आणि उन्हाच्या वाढत्या झळा यामुळे छोटी ठिणगी क्षणार्धात मोठ्या आगीत रूप घेत आहे. प्रचंड वेगाने पसरत जाणारी आग आटोक्यात आणताना वन विभागाची दमछाक होत आहे.

डोंगर परिसर आगीत पूर्णता जळून खाक होत असल्यानेे येथील औषधी, दुर्मिळ वृक्ष, सरपटणारे प्राणी नष्ट होत आहेत. खालापुरात दिवसाआड आगीची घटना घडत असल्याने वनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणात घाला घातला जात आहे.

मानवनिर्मित वणव्यामुळे निसर्गाचे झालेले नुकसान भरून येण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी जातो. पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती कार्यक्रम राबविणे आवश्यक असून वनविभागाची यंत्रणा दुर्गम भागात आग विझविण्यासाठी तोकडी पडत असल्याचे वनप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT