Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्यात

Biodiversity Crisis : रायगड जिल्ह्यात सातत्याने जंगल भागात वणवे लागत असल्याने येथील वनसंपदा धोक्यात आली आहे.
Forest Fire
Forest Fire Agrowon
Published on
Updated on

Raigad News : रायगड जिल्ह्यात सातत्याने जंगल भागात वणवे लागत असल्याने येथील वनसंपदा धोक्यात आली आहे. वन विभाग आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने हे वणवे नियंत्रणात आणण्याचे काम केले जाते, यासाठी वन विभागाकडून हायटेक यंत्रणा राबवल्या जात असल्या तरी वणव्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. जंगलांना आगी लागण्यात रायगड जिल्हा गडचिरोली जिल्ह्यानंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ज्या ठिकाणी आगीमुळे तापमानात वाढ झालेली आहे, त्या विभागातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवर काही क्षणात अलर्ट मेसेज देण्याची सॅटेलाइट यंत्रणा भारतीय वन संरक्षण संस्थेच्या माध्यमातून विकसित केली जात आहे. याचबरोबर १९२६ ही हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे.

Forest Fire
Forest Fire Prevention : जंगलांना वनव्यापासून वाचवण्यासाठी जाळरेषा रचण्यास सुरुवात

सततची जनजागृती आणि केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे लहान-मोठे वणवे लागण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. यास नागरिकांचा हलगर्जीपणाही तितकाच कारणीभूत ठरत असल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत, यातून हे वणवे पसरत असल्याचे वनकर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

अलिबाग उपवन संरक्षकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ११ परिक्षेत्रांना ‘फायर ब्लॉ’ हे अद्यावत यंत्र देण्यात आले आहे. या यंत्राद्वारे जळीत रेषा मारणे, आग विझवणे यांसारखी कामे जलद करता येतात. यासाठी स्थानिक वन समितीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

Forest Fire
Forest Fire : सातपुड्यात वणवे थांबविण्याबाबत हवी योजना

वनसंपदा धोक्यात

आगींमुळे औषधी वनस्पती, कीटक, जिवाणू, सर्प, पक्षी, सरडे, पाली, ससे, हरणे, कोल्हे, लांडगे या सर्वांचे जीव धोक्यात येतात आणि त्यामुळे जंगलातील जीवन विस्कळित होऊन हे वन्यजीव निराश्रीत होतात, याची कल्पना सर्वसामान्यांना नसते.

९५ टक्के वणवे मानवनिर्मित

गेल्या पंधरावड्यात कर्जत, म्हसळा, रोहा, पोलादपूर येथे वणवे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या परिसरात मानवनिर्मित वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी पर्यावरण संस्थांनी केल्या होत्या; तर काही जमीन मालक गवत नष्ट करण्यासाठी आगी लावतात. या आगी अनियंत्रित झाल्यावर त्या अधिकच पसरत जातात. दारूभट्टी उभारण्यासाठी वणवे पेटवले जातात.

वन विभागाचे कर्मचारी येण्यास उशीर होतो. यादरम्यान स्थानिक तरुण जीव धोक्यात घालून हे वणवे विझवण्याचा प्रयत्न करतात; आम्ही ‘अरण्य आपद्वव’ हा उपक्रम सुरू केला आहे, त्याद्वारे जागृती केली जात आहे.
- सागर दहिंबेकर, सदस्य वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com