KVK  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change Impact: हवामान बदलानुसार कांद्याचे व्यवस्थापन करा : डॉ. काळे

Scientist Advice: या वर्षीच्या अनियमित हवामान बदलामुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य खत, पाणी आणि रोग व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.

गणेश कोरे

Pune News: या वर्षी सततच्या हवामान बदलामुळे कांदा उत्पादकतेवर परिणाम होण्याचे प्रमाण जास्त असू शकते. कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर व कृषी विज्ञान केंद्राने शिफारशी केलेल्या जातींची निवड करून हंगामानुसार या पिकांची लागवड करणे गरजेचे आहे.

नुकसान टाळण्यासाठी वातावरणातील बदलानुसार कांदा पिकासाठी खतांची मात्रा, पाणी, रोग नियंत्रण आदींचे व्यवस्थापन करा, असा सल्ला राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला.

कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन व टोमॅटो पिकावरील विषाणूजन्य रोगावरील उपाययोजना या विषयी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विभाग आत्मा, पुणे यांच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती.

या वेळी केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे, पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, उद्यानविद्या शास्त्रज्ञ भरत टेमकर, मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव, कार्यक्रम सहायक धनेश पडवळ, आत्माचे धोंडिभाऊ पाबळे, सूर्यकांत विरणक,

आयटीसीचे सूरज गुप्ता, नितीन चौधरी, कांदा उत्पादक शेतकरी दत्तात्रय येवले, सागर चिखले, उत्तम जाधव, डॉ. दत्ता खोमणे उपस्थित होते. डॉ. राजीव काळे, पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव, उद्यानविद्या शास्त्रज्ञ भरत टेमकर यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT