Ujani Dam water storage agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam water storage : उजनी धरणाचा पाणीसाठा अद्याप मायनस; नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्याचे भवितव्य ठरणार

sandeep Shirguppe

Water Storage : पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा अद्यापही उणे आहे. जून महिना संपला तरी धरण साठ्यात अत्यंत संथ गतीने पाण्याची आवक असल्याने अद्याप धरण उणे ४० टक्क्यांवर आले आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत निच्चांकी पातळीवर उणे ६० टक्क्यांवर पोहोचलेले उजनी धरण आता उणे ४० टक्क्यांवर आले आहे. पावसाळा सुरू होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. ७ जूनपासून ३ जुलैपर्यत उजनीत १० टीएमसी पाणी आल्याने धरणावर अवलंबून सर्व घटकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

उजनी धरणावर नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ४२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरला उजनी धरणातील पाण्याचा विशेषत: उन्हाळ्यात आधार मिळत असतो. रब्बीच्या जिल्ह्याची ओळख पुसून सोलापुरात खरीपाचे क्षेत्र वाढण्यात उजनी धरणाचा मोठा वाटा आहे. राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून आता सोलापूरची ओळख असल्याने या जिल्ह्याला पाण्याची मोठी गरज असते.

जिल्ह्यात उसाबरोबरच फळबागांचे क्षेत्र वाढत असल्याने उजनी धरणातील पाणीपातळीकडे सर्वांचेच लक्ष असते. दरम्यान, सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आता समांतर जलवाहिनी टाकली जात असून त्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे.

भीमा नदीतून दरवर्षी तीन-चारवेळा सोडले जाणारे पाणी आता सोडावे लागणार नाही. त्यामुळे धरणातील ते पाणी शेतीसाठी दिले जाऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, अद्याप धरण प्लसमध्ये आलेले नसून त्यासाठी धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

धरणातील पाणीसाठा

०४२ टीएमसी

धरणातील पाण्याची टक्केवारी

"उणे४०.७६

धरणात येणारा विसर्ग

" २१० क्यूसेस

२६ दिवसांत धरणात आलेले पाणी

०१० टीएमसी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

Neera Karha Upsa Irrigation Scheme : बारामतीचा जिरायत शिक्का पुसणार

Agriculture Input Subsidy : निविष्ठांचे अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

Bioplastic Production : ‘बायो प्लॅस्टिक’ चे उत्पादन वाढविणे काळाची गरज

SCROLL FOR NEXT