Kolhapur Dams Water : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. यामुळे धरण आणि तलावांतील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जलसंपदा विभागाने शेतीसह पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन केले. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील ४ मोठी धरणे, ११ मध्यम प्रकल्प व ५६ तलावांमध्ये एकूण सरासरी ६२.४१ टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती दिली आहे.
सध्या धरणे व तलावांमध्ये पुरेसे पाणी असून ते जून महिन्यापर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याच्या उन्हाळी पाळीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी पाण्याची टंचाई लवकरच जाणवली होती. त्यावेळी रब्बी हंगामासाठी धरणे व तलावांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ऑक्टोबर महिन्यातच पाणी घ्यायला सुरुवात झाली होती. परंतु यंदा चित्र वेगळे आहे.
यावेळी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे धरणे व तलाव भरून पुरेसा पाणीसाठा झाला. आता उन्हाच्या झळा वाढत असून हळूहळू पाणी कमी होत आहे. तरीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. जूनपर्यंत पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील १५ धरणांमध्ये एकूण ४०२ टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ६९ टक्के इतकी आहे. तसेच ५६ तलावांमध्ये एकूण १२३.८६ टी.एम.सी. पाणीसाठा आहे. हे प्रमाण ५९.३४ टक्के इतके आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण सरासरी ६२.४१ पाणीसाठी असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.
राधानगरी (६८), तुळशी (७५), दूधगंगा (४९), वारणा (६७), कासारी (६६), कडवी (७२), कुंभी (६९), पाटगाव (६४), चिकोत्रा (७१), चित्री (६९), जंगमहट्टी (६९), घटप्रभा (६२), जांबरे (७६), आंबेओहोळ (८८), सर्फनाला (६९).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.