Marathwada Water storage  Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Water Storage : खानदेशात प्रकल्पांतील जलसाठा वाढला

Dam Water Stock : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा सध्या स्थिर असून, हा साठा सुमारे ४५ टक्के एवढा आहे. गिरणा धरणातील साठा ४२ टक्के एवढाच आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा सध्या स्थिर असून, हा साठा सुमारे ४५ टक्के एवढा आहे. गिरणा धरणातील साठा ४२ टक्के एवढाच आहे. जलसाठा मागील काही दिवसांपासून स्थिर असून, पुढे चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आहे. पण या धरणाचा लाभ जळगाव जिल्ह्यास अधिक आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमधील अनेक गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी या धरणातून पाणी सोडले जाते. तसेच रब्बीत २१ हजार हेक्टरला लाभ मिळतो.

या धरणातून तीनदा टंचाई दूर करण्यासाठी नदीत पाणी सोडले जाते. तर रब्बीसाठीदेखील तीनदा आवर्तन मिळते. धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. हे धरण मागील वर्षी ५६ टक्के भरले होते. धरणातील पाण्याचा चांगला लाभ गिरणा काठच्या गावांना होतो. पण त्यात सद्यःस्थितीत धरणात फक्त ४२ टक्के जलसाठा आहे. गिरणा धरण पूर्ण भरण्यासाठी या धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पावसाची गरज आहे.

नाशिकमधील नांदगाव, मालेगाव, सटाणा, चांदवड आदी भाग या धरणाच्या लाभक्षेत्रात आहे. या नदीचा उगम गुजरातमधील सापुतारा व लगतच्या डोंगरांत आहे. तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) धरणातील जलसाठा ३५ ते ३९ टक्के एवढा राखला जात आहे. त्यातून विसर्ग सुरू आहे. या धरणातील पाण्याची आवक घटली आहे. तापी नदीत प्रवाही पाणी आहे. पण हतनूर धरणात ५५ टक्के गाळ असल्याने जलसाठा झपाट्याने घटतो.

हतनूरमधून तीनदा रब्बीसाठी आवर्तन दिले जाते. तसेच दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत व नदीकाठच्या सुमारे १० गावांमधील टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाते.

जामनेरातील वाघूर धरणाची साठवण क्षमता आठ टीएमसी आहे. यातही सुमारे ६५ टक्के जलसाठा आहे. या धरणातून जामनेर शहर, जळगाव शहर व औद्योगिक वापरासाठीदेखील पाणी दिले जाते. यामुळे धरणातील साठाही वाढण्याची गरज आहे. वाघूरचे लाभक्षेत्र अजिंठा डोंगर व परिसरात आहे. या भागात जोरदार पाऊस न झाल्याने वाघूर धरणातील जलपातळी मागील काही दिवसांपासून ६५ टक्क्यांपर्यंत स्थिर आहे.

...या धरणांत जलसाठा १०० टक्के

जळगाव जिल्ह्यातील रावेरातील मंगरूळ, सुकी, यावलमधील हरिपुरा, मोर, वड्री, निंबादेवी, चोपड्यातील गूळ, धुळ्यातील शिरपुरातील अनेर, साक्रीमधील मालनगाव, जामखेली, अक्कलपाडा, पांझरा, बुराई, नंदुरबारातील चिरडे, दरा, देहली, सुसरी हे लघु व म मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

...या प्रकल्पांतील जलसाठा अल्प

जळगाव जिल्ह्यातील बोरी, भोकरबारी व मन्याड हे प्रकल्प कोरडे आहेत. तर अग्नावती, बहुळा, हिवरे, अंजनी, मन्याड, तोंडापूर, या धरणातील साठा अल्प आहे. धुळ्यातील अमरावती, सोनवद आदी प्रकल्पांतील जलसाठाही कमीच आहे. यामुळे पुढे जोरदार पाऊस झाल्यास हे प्रकल्प भरतील, अशी अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT