Khandesh Water Project : सातपुड्यातील लघू प्रकल्प भरू लागले

Water Storage : नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगरलगत सातपुडा पर्वतरांगा आहेत.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतातील लघू व मध्यम प्रकल्प भरले आहेत. त्यात यावल तालुक्यातील मोर, हरिपुरा, वड्री, रावेरातील सुकी, नंदुरबारमधील शहाद्यातील सुसरी हे लघू व मध्यम प्रकल्प भरले आहेत. तसेच अन्य प्रकल्पांतही जलसाठा मुबलक आहे.

नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगरलगत सातपुडा पर्वतरांगा आहेत. या भागात अनेक लहान-मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यात नंदुरबारातील सुसरी प्रकल्पाचे लाभक्षेत्र सातपुडा भागात आहे. हा लघू प्रकल्पदेखील भरला आहे.

Water Storage
Water Storage : नांदेडमधील प्रकल्पात १५.८९ दलघमीने वाढला पाणीसाठा

शिरपुरातील अनेर प्रकल्पदेखील भरण्याच्या स्थितीत आहे. चोपड्यातील गूळ प्रकल्पातही जलसाठा ५५ टक्क्यांवर आहे. यावलमधील मोर मध्यम प्रकल्पदेखील भरला आहे. रावेरातील मंगरूळ प्रकल्पातील जलसाठा ६९ टक्क्यांपर्यंत आहे. तसेच अभोडा प्रकल्पदेखील ६१ टक्क्यांवर भरला आहे. यावलमधील मोर, रावेरातील अभोडा, मंगरूळ व सुकी हे प्रकल्प मागील वर्षी जुलैमध्येच भरले होते. यंदाही मोर, सुकी हे मध्यम प्रकल्प जुलैतच भरले आहेत.

हतनूरमधून विसर्ग

जळगाव जिल्ह्यात भुसावळनजीकच्या तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातही आवक सुरू आहे. तापी नदीच्या उगमक्षेत्रात व पूर्णा नदीच्या क्षेत्रातही चांगला पाऊस आहे. तापी नदीचे उगमक्षेत्र सातपुडा पर्वतात बैतुल भागात आहे. सातपुड्यातून ही नदी खानदेशात येते. खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांतून नदीचा मोठा प्रवाह जातो. पुढे गुजरातेत ही नदी जाते.

Water Storage
Water Storage Marathwada : मराठवाड्यातील पाणीसाठा १३ टक्क्यांवर

हतनूर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्याचे आठ दरवाजे बुधवारी (ता. १७) उघडण्यात आले. जलसाठा नियंत्रणासाठी हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीला प्रवाही पाणी आहे. मागील १५ दिवसांपासून तापी नदीत चांगला जलप्रवाह आहे. मध्यंतरी तापीत प्रवाह वाढला होता. कारण हतनूरचे १४ दरवाजे उघडले होते. तापी नदीकाठी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.

पश्‍चिम भागात प्रकल्पांत कमी जलसाठा

जळगावच्या पश्‍चिम भागातील मन्याड, बोरी, भोकरबारी या प्रकल्पांत शून्य टक्के जलसाठा आहे. गिरणा नदीवरील सर्वांत मोठ्या गिरणा धरणातही जलसाठा ११.७४ टक्केच आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे.

पण त्याचा उपयोग जळगाव जिल्ह्यात अधिक आहे. १८ टीएमसी एवढी त्याची साठवण क्षमता आहे. तसेच तोंडापूर, अंजनी, अग्नावती, बहुळा, धुळ्यातील पांझरा, मालनगाव, बुराई, सोनवद हे प्रकल्पदेखील पूर्ण भरलेले नसल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com