Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Level : मध्यम, लघू प्रकल्पांतील पाणीसाठा बारा टक्क्यांवर

Water Issue : मराठवाड्यातील ७५ माध्यम व ७४९ लघू प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा १२ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील सर्व ८७७ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा २३ टक्क्यांवर आला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील ७५ माध्यम व ७४९ लघू प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा १२ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील सर्व ८७७ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा २३ टक्क्यांवर आला आहे.

जसजशी उन्हाची तीव्रता वाढते आहे तेच त्याचा मराठवाड्यातील पाणीसाठ्याची स्थिती चिंतनीय होत चालली आहे. मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, ७५ मध्यम व ७४९ लघू प्रकल्पांत १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये २६ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात १७ टक्केच उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी सीनाकोळेगाव व माजलगाव प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत.

दुसरीकडे निम्न तेरणा प्रकल्पात केवळ पाच टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, निम्न दुधना व मांजरा प्रकल्पात ९ टक्के, निम्न मनार प्रकल्पात ३३ टक्के, सिद्धेश्‍वरमध्ये ३१ टक्के, जायकवाडीत २३ टक्के, येलदरीत ४० टक्के, ऊर्ध्व पैनगंगा मध्ये ५४ टक्के, विष्णुपुरीत ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पात ७ टक्के, तर ५७ लघू प्रकल्पात केवळ एक टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पात १३ टक्के, तर १६ मध्यम प्रकल्पात ९ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात २० टक्के, तर १२६ प्रकल्पांत केवळ दहा टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पात ९ टक्के, तर १३४ लघू प्रकल्पांत १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. धाराशिव जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांत केवळ पाच टक्के, तर २०६ लघू प्रकल्पात केवळ ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत ३० टक्के, तर ८० लघू प्रकल्पांत ३६ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत दहा टक्के, तर दोन मध्यम प्रकल्पांत केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

१०८ लघू, मध्यम प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील चार मध्यम व १०४ लघू प्रकल्प मिळून तब्बल १०८ प्रकल्प कोरडे पडले आहेत. कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १२, बीडमधील ३५, लातूरमधील दहा, धाराशिवमधील ४७, लघू प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे कोरड्या पडलेल्या मध्यम प्रकल्पांमध्ये जालना व धाराशिवमधील प्रत्येकी एक, तर बीडमधील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

२५ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणीमधील प्रत्येकी एक, जालना व लातूरमधील प्रत्येकी तीन, बीडमधील सहा तर धाराशिवमधील सर्वाधिक दहा प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघू प्रकल्पांची संख्या २६८ इतकी आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ३१, जालन्यातील १५, बीडमधील ४६, लातूरमधील ५६, धाराशिवमधील ९३, नांदेडमधील सहा, परभणीतील १६ व हिंगोलीतील पाच लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT