Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : परभणी जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट गहिरे

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने घट होत आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आहे. गुरुवारी (ता. १४) पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील २२ पैकी ८ लघु तलाव कोरडे पडले असून ८ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला तर केवळ ६ तलावांमध्ये सरासरी ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. दोन पैकी मासोळी (ता. गंगाखेड) मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त साठा संपुष्टात आला असून करपरा (ता. जिंतूर) मध्यम प्रकल्पात केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला.

परभणी जिल्ह्यातील तापमान ३५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. तसेच विविध कारणांनी उपसा सुरु आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमधील लोकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्यांची गंभीर होत आहे.

गुरुवारी (ता. १४) जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, वडाळी, चारठाणा, चिंचोली, केहाळ, दहेगाव हे ८ लघु तलाव कोरडे पडले आहेत. पेडगाव (ता. परभणी), आंबेगाव (ता. मानवत), नखातवाडी (ता. सोनपेठ), कोद्री (ता. गंगाखेड), भोसी (ता. जिंतूर), कवड (ता. जिंतूर), मांडवी (ता. जिंतूर), पाडळी (ता. जिंतूर) या ८ लघु तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. झरी (ता. पाथरी) तलावांत ६७ टक्के, तांदूळवाडी (ता. पालम) तलावात ३१ टक्के, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) तलावात ३४ टक्के, टाकळगाव (ता. गंगाखेड) तलावात ३ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) तलावात १३ टक्के, आडगाव (ता. जिंतूर) तलावात ४ टक्के असा ६ तलावांमध्ये सरासरी ३.०४४ दलघमी म्हणजेच ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी (२०२३) १४ मार्च रोजी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी १२.३२८ दलघमी (२९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

गुरुवारी (ता. १४) जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पाच्या जलाशयात १.६५४ दलघमी (७ टक्के ) पाणीसाठा शिल्लक होता. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. गतवर्षी (२०२३) १४ मार्च रोजी करपरा मध्यम प्रकल्पांमध्ये ११.९५९ दलघमी (४४ टक्के) व मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये १४.७७२ दलघमी (५४ टक्के) तर दोन प्रकल्पांमध्ये सरासरी २६.७३१ दलघमी (५१.३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.

पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस

२०२३ मधील पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात झालेल्या अल्प पावसामुळे या दोन प्रकल्पात २०२३ वर्षीच्या तुलनेत खूप कमी पाणीसाठा उपलब्ध झाला होता. नोव्हेंबर मॉन्सूनोत्तर पावसामुळे अनेक तलावातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. उपसा देखील काही दिवस बंद राहिला. परंतु गेल्या पाच महिन्यात विविध कारणांनी प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT