Vandri Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Vandri Dam Water : वांद्री धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

Dam Water Release : दुरुस्तीच्या कामासाठी पाणी वांद्री नदीत सोडून धरणातील पाणीसाठा कमी केला जात आहे. या पाण्यामुळे नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे.

Team Agrowon

Palghar News : वांद्री धरणाच्या मुख्य विमोचक विहीर (जॅकवेल) मधील पाणीगळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पाणी वांद्री नदीत सोडून धरणातील पाणीसाठा कमी केला जात आहे. या पाण्यामुळे नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे.

यामुळे वांद्री नदी काठच्या गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्र ओलांडणे, पोहणे, अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वांद्री नदीकाठच्या ग्रामपंचायतींना पत्र देऊन जनजागृती करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

पाटबंधारे विभागाच्या वांद्री धरणाच्या मुख्य विमोचक विहिरीत पडझड झाल्यामुळे काही वर्षांपासून पाणीगळती सुरू झाली होती. विहिरीतील गळतीमुळे धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात होते. पाटबंधारे विभागाकडून विहिरीतून होणारी पाणीगळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम करण्यासाठी धरणातील पाण्याची पातळी कमी करण्याची आवश्यकता आहे.

यासाठी धरणातील पाणी विमोचक विहिरीचे दरवाजे उघडून वांद्री नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाढ होऊन पाणीपातळी वाढली आहे. यामुळे वांद्री नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला होता. वांद्री नदी ओलांडताना, कपडे धुणे, तसेच मासेमारी करताना संभाव्य दुर्घटनेत जीवितहानी होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाकडून वांद्री नदी काठच्या ग्रामपंचायतींना खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांना सावधगिरीच्या सूचना

वांद्री नदीकाठच्या नागरिकांनी नदीत मासेमारी, पोहणे, अंघोळ तसेच कपडे धुणे आदी कामांसाठी नदीपात्रात जाऊ नये. नदी परिसरात सावधगिरीने वावरण्यासाठी नागरिकांना सूचित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरून दवंडी तसेच समाज माध्यमातून ग्रामस्थांना माहिती देण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने नदी काठच्या ढेकाळे, जानसई, सातीवली, हालोली, दहिसरतर्फे मनोर, साखरे, नावझे, गिराळे आणि पारगाव ग्रामपंचायतींना केले आहे.

धरणाच्या जॅकवेलमधील गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. त्यामुळे दुरुस्तीचे काम प्रास्तावित करण्यात आले होते. निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी धरणातील पाणीपातळी कमी केली जात आहे.
- नीलकमल गवई, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT