
Solapur News: गेल्या आठवडाभरापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील उजनी धरणात चारच दिवसांत तब्बल सहा टीएमसी पाणी वाढले आहे. गत वर्षी जूनअखेर उणेपातळीत असणारे धरण यंदा मे महिन्यातच अधिक पातळीत पोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतीच्या पाण्यासह सुमारे १२५ हून अधिक पाणी योजनांसाठी उजनी धरणातील पाण्याचा उपयोग होतो. मागच्या ७-८ दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. धरणाच्या कार्यक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
उजनी धरणाची पाणीपातळी २३ टक्क्यांपर्यंत पोचली होती. पण सततच्या या पावसामुळे ती आता उणे १२ टक्क्यांवर आली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत धरण अधिक पातळीत पोचणार आहे.
२२ मे रोजी धरणात ५१.७१ टीएमसी पाणीसाठा होता. तो रविवारी (ता.२५) चारच दिवसात ५७.१९ टीएमसीपर्यंत पोचला आहे. तर सोमवारी तो ५९.५२ टीएमसीवर पोचला. विशेष म्हणजे रविवारी (ता.२५) एकाच दिवसात ३ टीएमसी पाणीसाठा झाला.
धरणात उणे ७.७२ टक्के पाणीसाठा
सोमवारी (ता.२५) उजनी धरणाची पाणीपातळी ४९०.४२० मीटरपर्यंत राहिली, तर एकूण पाणीसाठा ५९.५२ टीएमसी इतका झाला. त्यात उपयुक्त पाणीसाठा उणे ४.१३ टीएमसी राहिला. तर पाण्याची टक्केवारी उणे ७.७२ टक्के इतकी राहिली. दौंडकडूनही उजनी धरणात विसर्ग सुरूच असून, धरणाकडे १८ हजार ५०६ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.