Watershed Yatra  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : सिंचन क्षमता सुधारणेतून उत्पादनवाढ व्हावी

Water Conservation : जलसंधारण आणि सिंचनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत प्रभावी वाढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Team Agrowon

Nashik News : जलसंधारण आणि सिंचनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करून शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत प्रभावी वाढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच पाणी वाचविणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाणी जमिनीत मुरवणे आदींचे महत्त्व जाणले पाहिजे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान कृषी सिंचन योजना-पाणलोट घटक २.० हा कार्यक्रम भारतीय कृषी क्षेत्रातील पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत वॉटरशेड रथयात्रेचा प्रारंभ ८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यानंतर यात्रा छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगरनंतर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वाघाड पोहोचली. या वेळी मृद व जलसंधारण सचिव गणेश पाटील, प्रादेशिक मृद व जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत, जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी वैशाली ठाकरे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अजित कापडणीस, नाशिक तसेच मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वॉटरशेड यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या योजनेअंतर्गत माथा ते पायथा व पाणलोट आधारित व्यवस्थापन या तत्त्वांचा वापर करण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील ५ गावांची निवड करण्यात आली होती. यात वाघाड, जालखेड, श्रीरामनगर, ठेपणपाडा, कोकणगाव या गावांचा समावेश आहे. सक्रिय लोकसहभाग व तरुण पिढीला पाणलोट क्षेत्र विकासाचे महत्त्व कळावे याबाबत मंत्री झिरवाळ यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी पाटील यांनी पाणलोट विकास याबद्दल संबोधित करताना शाश्वत जलसंधारण पद्धती विकसित करणे, जलस्रोतांच्या संरक्षणासह सिंचनाची उपलब्धता व कार्यक्षमता सुधारण्यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाअंतर्गत मंद्राई शैक्षणिक व सामाजिक संस्था (धुळे) यांनी प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करताना निवड झालेल्या गावात ग्रामसभा घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या पाणलोट क्षेत्र विकास विषयांवर निबंध स्पर्धा, रांगोळी, चित्रकला व वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेतल्या.

स्पर्धेतील विजेत्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते या वेळी गौरवण्यात आले. तसेच या संस्थेमार्फत पाणलोट कामात चांगली कामगिरी करणाऱ्या ‘पाणलोट धारिणी ताई’ व ‘पाणलोट योद्धा’ अशा दोन जणांची देखील निवड करण्यात येऊन त्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

जय गुरुदेव भारुड मंडळ, कोकणगाव यांच्यामार्फत उत्कृष्ट असे भारुड करून पाणलोट विकासाबाबत जनजागृती करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आशा गांगोडे, सरपंच प्रवीण शिंगाडे, उपसरपंच गुलाब शिंगाडे, सदस्य संतोष गांगोडे, कलाबाई रहेरे, सावित्राबाई गांगोडे, सदस्य गंगूबाई शिंगाडे, सदस्य लक्ष्मण पालवे, जिल्हा परिषद शाळा वाघाडचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT