Girna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Girna Dam : गिरणा धरणातून आवर्तन सुटणार

Water Circulation : खानदेशातील सर्वात मोठ्या गिरणा धरणातून या आठवड्यात टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील सर्वात मोठ्या गिरणा धरणातून या आठवड्यात टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाणार आहे. सुमारे १२० गावांच्या पाणी योजनांच्या स्त्रोतांसह नदीकाठच्या शिवारातील विहिरी, कूपनलिकांच्या पुनर्भरणासाठी हे पाणी बळ देणार आहे.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु या धरणाचा लाभ नाशिकच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात अधिक आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल या भागातील २१ हजार हेक्टरवरील रब्बीस गिरणातून पाणी मिळते. तसेच चाळीसगाव, भडगाव, पाचोरा शहरांना या धरणातून पाणी मिळते.

नाशिकमधील फक्त नांदगाव व मालेगाव शहर आणि मालेगाव औद्योगिक वसाहतीस या धरणातून पाणी दिले जाते. पाऊसमान कमी राहिल्याने या धरणात एकूण ५६ टक्केच जलसाठा होता. यामुळे यंदा या धरणातून रब्बीसाठी पाणी देण्यात आले नाही. फक्त उद्योग व पिण्यासाठी या धरणाचे पाणी राखीव होते.

यामुळे जळगाव जिल्ह्यातील २१ हजार हेक्टरवरील रब्बी हंगाम उभा राहू शकला नाही. गिरणा पट्ट्यात यंदा गिरणा धरणात कमी जलसाठा असल्याने टंचाई आहे. जलसाठे कमी होत असल्याने गिरणा परिसरात टंचाईची स्थिती पुढे आणखी गंभीर होईल, असेही संकेत आहेत.

चौथे आवर्तन

गिरणा धरणातून दरवर्षी पाच वेळेस नदीत टंचाई दूर करण्यासाठी आवर्तन दिले जाते . यंदा तीन वेळेस आवर्तन सोडण्यात आले आहे. चौथे आवर्तन या आठवड्यात सुटणार असून, गिरणा धरण प्रशासनाने त्याबाबत वरिष्ठ कार्यालय, प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. पाण्यासंबंधी मालेगाव, भडगाव, चाळीसगाव आदी शहरांसह उद्योगाकडूनही मागणी आली आहे.

पाण्याचे आवर्तन गिरणा नदीच्या शेवटच्या भागात असलेल्या कानळदा (ता.जळगाव) या गावापर्यंत पोचल्यानंतर बंद केले जाते. धरणाचे क्षेत्र ते शेवट या दरम्यानच्या सुमारे १२० गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी या धरणातील पाण्याचा लाभ होतो. तसेच नदीकाठच्या शिवारातील विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होते.

२० टक्केच जलसाठा

गिरणा धरण खानदेशात सर्वात मोठे धरण आहे. याची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. त्यात सध्या ३८२१ दशलक्ष घनफूट एवढा जलसाठा आहे. यानुसार धरणात सध्या २० टक्के जलसाठा आहे. या धरणातून टंचाई दूर करण्यासाठी आवर्तन सोडल्यानंतर जलसाठा आणखी कमी होईल. सध्या तापमानही ४३ ते ४४ अंश सेल्सिअसवर आहे. यामुळे जलसाठा १० टक्क्यांपर्यंत खाली येईल, अशीही शक्यता आहे. यामुळे पाण्याची काटकसर करावी, असे आवाहन केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT