Vineyard Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसाने २० हजार एकर द्राक्ष बागांचे नुकसान

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. या पावसाचा फटका फुलोरा अवस्था आणि काढणीला आलेल्या द्राक्षांना बसला असून, सुमारे वीस हजार एकरांवरील द्राक्षांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात सुमारे १ लाख ५० हजार एकरांवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी आणि पाण्याची कमतरता याचे संकट ओढवले. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत फळछाटणी केली.

मिरज तालुक्याचा पूर्व भाग आणि कवठेमंकाळ तालुक्यात आगाप फळछाटणी केली जाते. पाण्याची टंचाई असून सुद्धा द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी उत्तमरीत्या साधल्या आहे. या भागातील द्राक्ष काढणीला आल्या आहेत. तर जिल्ह्यातील इतर भागांमध्ये द्राक्ष फुलोरा अवस्थेमध्ये आहेत.

सलग आठ-दहा दिवस ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे द्राक्षावरील रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. द्राक्ष उत्पादक शेतकरी डाऊनी, फळकुज यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम, तर काही भागांमध्ये मॉन्सूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक मॉन्सूनोत्तर पावसाने सुरुवात केल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

दिवसभर कडक उन्ह आणि रात्री पाऊस यामुळे शेतकरी अडचणी आला आहे. या पावसामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या बागांमध्ये फळकुज होण्यास सुरुवात झाली आहे. तर आगाप छाटणी केलेल्या ५० टक्के बागांमध्ये क्रॅकिंगची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, द्राक्षाच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

अडचणीत वाढ

गेली तीन-चार वर्षे द्राक्षशेती अडचणीत आहे. यंदाही दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे होते. या अस्मानी संकटाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पाठ सोडलेली दिसत नाही. आधीच द्राक्षशेती अडचणीत आलेली असताना मॉन्सूनोत्तरने द्राक्ष उत्पादकांसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

छाटणी होऊन ३० ते ४५ दिवस झालेल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसलेला दिसत आहे. पहाटे पडणाऱ्या दवामुळे फळकुज मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. त्यात आता मॉन्सूनोत्तर पावसाने संकट गडद झाले आहे. विशेषतः अनुष्का, एस. एस., माणिक चमन या वाणाची फुलोऱ्याच्या टप्प्यामध्ये फळकुज होताना दिसत आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात हा प्रकार पाहायला मिळत आहे.

पावसाने काय परिणाम होणार?

- उत्पन्नात घट होण्याची शक्यता.

- आर्थिक फटका.

- काढणीला आलेल्या द्राक्षांचे ५० टक्के नुकसान.

- बाधित क्षेत्र वाढण्याची शक्यता.

जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने सुमारे २० हजार एकरांवरील क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसामुळे फळकुज, क्रॅकिंगची समस्या निर्माण होऊ लागली आहे. चार दिवसांमध्ये द्राक्षाचे नुकसान झालेले एकूण क्षेत्र समजेल.
- चंद्रकांत लांडगे अध्यक्ष, मध्यवर्ती विज्ञान समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT