Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : पुरंदर तालुक्यातील वरवंड तलाव कोरडा, जनाई योजनेचा पाणीपुरवठा स्थगित

Varwand Lake Water Scarcity : जनाई योजनेतील लाभ क्षेत्रातील पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, योजनेचा पाणी उचलण्याचा स्रोत असणाऱ्या दौंड तालुक्यातील वरवंड तलावातील पाणीपातळी कमी झाली आहे.

Team Agrowon

Purandar News : जनाई योजनेतील लाभ क्षेत्रातील पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, योजनेचा पाणी उचलण्याचा स्रोत असणाऱ्या दौंड तालुक्यातील वरवंड तलावातील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे आठ दिवस योजना चालून सध्या बंद पडलेली आहे.

खडकवासला कालव्यातील पाणी दौंड तालुक्यातील वरवंड तलावा सोडल्यानंतर तेथून जनाई योजनेतील लाभ क्षेत्रासाठी हे पाणी उचलले आहे. योजनेच्या लाभार्थी भागातील शेतकऱ्यांची असणारी मागणी विचारात घेऊन नोव्हेंबर महिन्याच्या अखेरला योजनेचे पाणी आवर्तन सुरू केल्यानंर एक डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये योजनेचा पाणीपुरवठा सुरू होता.

ऑगस्टमधील आवर्तनामध्ये ज्या शेतकऱ्यांना पाणी देण्यात आले नव्हते. त्या शेतकऱ्यांना या आठ दिवसांचे कालावधीमध्ये पाणी देण्यात आले. त्यानुसार पिसे येथील काही ठिकाणी पाणी सोडल्यानंतर बारामती तालुक्यातील बोरकरवाडी तलावामध्ये या योजनेचे पाणी सोडण्यात आले. पुरंदर तालुक्यातील लाभार्थी असणाऱ्या राजुरी, नायगाव, पांडेश्‍वरमधील शेतकरी सध्या रब्बी पिके पाऊस नसल्याने वाचविण्यासाठी या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू ही पिके या भागात मोठ्या प्रमाणावरती आहेत. पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. सध्या खडकवासला कालव्यामधून शेवटच्या इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. हे पाणी वरवंट तलावामध्ये तातडीने सोडून जनाई लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे.

यासाठी बारामती व पुरंदर तालुक्यांतील लाभ क्षेत्रातील शेतकरी मागील आठवड्यामध्ये पुण्यात पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले होते. त्यानुसार त्यांना या आठवड्यापासून १८ डिसेंबरपासून वरवंड तलावात पाणी सोडून योजनेचे पाणीपुरवठा चालू करण्याबाबत आश्‍वासन देण्यात आले आहे. यामुळे येथील शेतकरी हे पाणी केव्हा येते याची वाट आम्ही शेतकरी पाहत असल्याचे संदीप खेसे यांनी सांगितले.

रब्बीतील पिकांना आता जनाईमधून पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया जाईल. जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्‍नदेखील पुढील काळात अवघड होईल. यासाठी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पुरंदर तालुक्यातील आमच्या लाभ क्षेत्रातील राजुरी सह इतर सर्व गावांना तातडीने पाणीपुरवठा करावा.
ईशा भगत, सरपंच, राजुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT