Unseasonal Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain Crop Loss : लातूर-धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा कहर; शेतीचे मोठे नुकसान

Heavy Rain Crop Damage : दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरण बदलले असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. यावरून हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला.

Team Agrowon

Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी (ता. तीन) सायंकाळी पावसाने कहरच केला. मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बीतील ज्वारी व गहू पिकांना फटका बसला. काही भागात काढणीला आलेली ज्वारी भुईसपाट झाली तर गहू व कांद्याचे नुकसान झाले.

द्राक्षासह अन्य फळबागांनाही पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. झाडाखाली कैऱ्यांचा सडा पडला. ढगाळ वातावरणाने उकाड्यात प्रचंड वाढ झाली असताना दुसरीकडे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले.

दोन दिवसांपासून जिल्ह्यात वातावरण बदलले असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. यावरून हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो तंतोतंत खरा ठरला. बुधवारपासूनच (ता. दोन) ढगाळ वातावरण होऊन उकाडा वाढला.

बुधवारी काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचा फटका आंबा फळाला बसला. वाऱ्यामुळे आंब्याच्या कैऱ्यांचा सडा पडला. गुरुवारी काही भागात दिवसभर ऊन तर काही भागात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर वातावरणात बदल होऊन वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. काही भागात अर्धा तास तर काही भागात तासभर पावसाने धुमाकूळ घातला.

लातूर शहरात अर्धातासाचे पावसामुळे सखल भागात पाणी साचले. यासोबत तुंबलेल्या नाल्यांतील पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरली. बाजारात आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक वैतागून गेले. निलंगा तालुका व काही भागात ज्वारीचे पीक आडवे झाले.

काढणीला आलेला गहू व कांद्याचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात निलंगा, औसा, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ व लातूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. धाराशिव जिल्ह्यात द्राक्ष व आंब्याच्या फळबागांना पावसाचा फटका बसला. उमरगा, लोहारा, भूम, परांडा व वाशी तालुक्याला पावसाने झोडपले. पाऊस कमी आणि वारा जास्त असल्यामुळे आंबे गळून पडले. उमरग्यातील जुनी पेठेतील झाडावर वीज कोसळली.

अवकाळी पावसाने तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. ज्वारी, गहू व कांद्याचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या कैऱ्याही गळून पडल्या आहेत. शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. यामुळे सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- सुरज भुसनुरे व माधवराव नागूरे, शेतकरी, साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT