Crop Damage Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage: पिके पाण्यात, शेतकरी तणावात

Farmers Issue: यंदा मे महिन्यापासून पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जूनमध्ये जोर धरलेला पाऊस अद्यापही थांबायला तयार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिणामी सिन्नर तालुक्यातील पश्चिम भाग ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे.

मुकुंद पिंगळे

Nashik News: यंदा मे महिन्यापासून पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जूनमध्ये जोर धरलेला पाऊस अद्यापही थांबायला तयार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिणामी सिन्नर तालुक्यातील पश्चिम भाग ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे. सिन्नर-घोटी रस्त्यापासून पुढे थेट समृद्धी महामार्गापर्यंत भाजीपाला उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जमिनी उपळल्या असून भाजीपाला उत्पादक पट्टा उद्ध्वस्त झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला आहे. एकीकडे एप्रिल व मे महिन्यात शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या तीव्र झळा सोसल्या. अशा प्रतिकूल परिस्थितीत उन्हाळी भाजीपाला लागवडी केलेल्या होत्या.

मात्र मे महिन्यापासूनच पावसाने दणका देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आ वासून उभे राहिले आहे. पश्चिम पट्ट्यातील वडगाव, सोनांबे, कोनांबे, डुबेरे, लोणारवाडी, सोनारी, डुबेरवाडी, पाडळी, पांढुर्ली, शिवडा ठाणगाव, या भागांत भाजीपाला लागवडी मोठ्या प्रमाणावर असतात.

मात्र पावसाने अडचणी वाढविल्या. यात प्रामुख्याने हजारो हेक्टरवर टोमॅटो, कोबी, वाटाणा व पालेभाज्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेत उपळल्याने सोयाबीन, मका पिके पाण्यातच आहेत. त्यामुळे ओल्या दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती असल्याचे शेतकरी सांगतात.

हंगाम संपण्यापूर्वीच टोमॅटो हंगामाचा ‘द एन्ड’

‘‘उन्हाळ्यात २० गुंठे टोमॅटो लागवड केली. आत्तापर्यंत टोमॅटोचे १० ते १२ खुडे झाले असते. त्यातून ५०० क्रेट उत्पादन अपेक्षित होते. मात्र लागवड खराब झाल्याने दुसरा खुडा कसाबसा झाला. त्यातून अवघे २५ क्रेट टोमॅटो उत्पादन हाती आले. खर्चसुद्धा निघालेला नाही,’’ अशी परिस्थिती भाजीपाला उत्पादक शेतकरी संपत गीते यांनी सांगितले.

पावसामुळे ब्रोकोलीसारखे पीक सडून गेले. थोडेफार पीक वाचले आहे, तेही आता पाऊस उघडल्यानंतर करपा रोगाच्या विळख्यात सापडेल. शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. सरकारने या ओल्या दुष्काळात शेतकऱ्याला धीर द्यावा.
- कारभारी सांगळे, भाजीपाला उत्पादक, वडगाव, ता. सिन्नर
जमिनी पेरणीपूर्वीच पाण्याखाली आहे, तर भाजीपाला लागवडी रोगांच्या विळख्यात सापडल्या आहेत. वाटाणा लागवडीचे १०० टक्के नुकसान आहे. अनेक ठिकाणी पेरण्या राहून गेल्या. शेती अडचणीत आहे. नुकसान वाढत असून उत्पन्न नाही, कर्जाचे मीटर वाढत आहे.
- नंदू पवार, शेतकरी, सोनांबे, ता. सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT