Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : बारा हजार शेतकऱ्यांना विमा परतावे मिळण्यास सुरुवात

Crop Insurance Scheme : फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये सहभागी झालेल्या सर्व ७७ हजार ५०० केळी विमाधारकांना परतावे मिळावेत यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात फळ पीकविमा योजनेत २०२२-२३ मध्ये सहभागी झालेल्या सर्व ७७ हजार ५०० केळी विमाधारकांना परतावे मिळावेत यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. यातच काही दिवसांपासून मंजुरी असूनही प्रलंबित ठेवण्यात आलेले सुमारे १२ हजार शेतकऱ्यांचे परतावेदेखील गुरुवारी (ता. २३) मिळण्यास सुरुवात झाली.

जिल्ह्यात सुमारे ७७ हजार ५०० शेतकरी फळ पीकविमा योजनेत सहभागी झाले. या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर २२०२२ मध्ये केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. यात पीक पडताळणी व इतर कार्यवाही विमा कंपनीने वेळेत न केल्याने हकनाक विमाधारकांना त्रास झाला. नंतर सॅटेलाइट व एमआरसॅटच्या माहितीचा उपयोग करून केळी पिकाची पडताळणी विमा कंपनी व शासनाने नियम झुगारून सुरू केली.

यास शेतकऱ्यांचा विरोध होता. सरसकट सर्वच शेतकरी विमा परताव्यांसाठी पात्र आहेत, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत होते. यातच शासनाने फक्त ५३ हजार ८०० शेतकऱ्यांचेच केळी पिकासंबंधीचे विमा प्रस्ताव मंजूर केले. यातील सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांचे परतावे दिवाळीच्या काळात आले.

उर्वरित सुमारे १२ हजार शेतकऱ्यांचे परतावे आलेच नव्हते. यासंबंधी जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांनी बुधवारी (ता.२२) व गुरुवारी (ता.२३) मुंबईत विमा कंपनीशी चर्चा केली.

तसेच कृषी विभागाच्या वरिष्ठांची भेटही घेतली. तेथे सर्व कागदपत्र, माहिती सादर करून शासनाची पीक पडताळणी कशी अयोग्य आहे, असा मुद्दा मांडला. तसेच सर्व शेतकऱ्यांना परतावे दिले जावेत, अशी मागणी केली. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ११ हजार केळी विमाधारकांचे मंजूर असलेले परंतु प्रलंबित परतावे गुरुवारी देण्यास सुरुवात केली.

तसेच मंजूर नसलेल्या इतर सुमारे २४ हजार शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांपैकी सुमारे ११ हजार ३०२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे कृषी विभागाने सांगितल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी जारी केली.

तसेच उर्वरित सुमारे १० हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावांबाबतही सकारात्मक तोडगा निघेल, असे म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व ७७ हजार ५०० केळी विमाधारकांना सरसकट परतावे मिळावेत, असे पत्र पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन, कृषी विभागाला नुकतेच दिल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा शब्द पाळू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेतकऱ्यांना आश्वासन

Inspiring Farmer Story: सुखी संसाराची वाट शोधणारे दाम्पत्य

BJP Mumbai President: भाजपकडून आमदार अमित साटम यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी

Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा कोणताही विचार नाही

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

SCROLL FOR NEXT