Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसामुळे सोयाबीनसह तुरीचे पीक पाण्यात

Team Agrowon

Dharashiv News : परिसरातील धानोरा दगड, मळगी, मळगीवाडी, गुरूवाडी, आष्टा (ज.), कोळसुर, हिप्परगाराव, चिंचकोट, तलमोड, कराळी आदी ठिकाणी पावसामुळे सोयाबीन, तुरीचे पीक वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

यंदा पावसाने सुरवातीला जोरदार सुरवात केल्याने खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या, त्यानंतर शेतकऱ्यांनी वेळेवर अंतर मशागतीची कामे केल्याने पिके एकदम जोमदार आली होती.

यंदा उत्पादन व उत्पन्न वाढणार अशी अपेक्षा असताना ऐन काढणीच्या काळात पावसाने सतत व्यत्यय आणल्यामुळे सोयाबीन रानातच कुजून जात आहे. पावसाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने तुरीचे पीकही वाया गेल्यात जमा झाले आहे.

खरिपातील बहुतांश पिके वाया गेली असून आता रब्बी हंगामातील पिके सतत पडणाऱ्या पावसामुळे पेरणी करता येत नाहीत.

त्यामुळे खरीप हातचे गेले असून आता रब्बीचा हंगाम पण वाया जाईल का? अशी शंका शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. एकीकडे निसर्ग कोपला असताना मजूर वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk And Milk Project : परभणी जिल्ह्यातील ९ गावांमध्ये सिल्क आणि मिल्क प्रकल्प

Paddy Crop Damage : पावसामुळे तळामध्ये भात जमीनदोस्त

Ration Grain : रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

Orchard Cultivation : जलकुंड आधारित फळबाग लागवड वरदान

Grape Producer : द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवा

SCROLL FOR NEXT