Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : पावसाने तिघांचे बळी

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात बुधवारी (ता.२२) झालेल्या पूर्वमोसमी पाऊस आणि वादळवाऱ्याच्या तडाख्याने काही घरांसह पिकांचे नुकसान झालेच, पण या पावसात अंगावर वीज पडल्याने करमाळा, मोहोळ आणि माढ्यात तिघांचे जीव गेले. यात एका शाळकरी मुलाचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात सातत्याने पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.

यंदाचा उन्हाळा कडक जातो आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान जवळपास ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. अलीकडे ते काही प्रमाणात उतरले होते. पण आता पुन्हा त्यात वाढ झाली असून ते ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. दिवसभर कडक्याचे ऊन आणि सायंकाळी पावसाची हजेरी ठरलेली आहे.

माढा तालुक्यात आहेरगाव येथे बुधवारी दुपारी साडे चारच्या सुमारास वादळवाऱ्यासह पाऊस झाला. याच दरम्यान, विजेचा कडकडाट झाला. त्यात शेतीत काम करत असलेले शेतकरी पांडुरंग किसन जगताप (वय ५७) यांच्या अंगावर वीज पडली. त्यांना तातडीने टेंभुर्णीला हलवण्यात आले, पण त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत पापरी (ता. मोहोळ) येथे गोठ्याबाहेर बांधलेली गाय गोठ्यात आणत असताना अचानक अंगावर वीज कोसळून छाया बळिराम कासार (वय ४०) यांचा मृत्यू झाला.

या शिवाय शेतीचेही नुकसान झाले. सांगोला, पंढरपूर, माढा, मोहोळ, करमाळा या तालुक्यांत नुकसानीच्या काही घटना घडल्या. त्यात परितेवाडी (ता. माढा) येथे अप्पासाहेब जाधव, रामचंद्र कदम यांची तोंडल्याची बाग भुईसपाट झाली. त्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. वरवडे येथे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले.

काही झाडेही उन्मळून पडली. तर काढणीला आलेल्या केळीच्या बागा आणि आंब्यालाही त्याचा फटका बसला. भोसे (ता. पंढरपूर) येथे अनिल कोरके यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तर जनावरांच्या शेडही उडून पडला. करकंबच्या पश्चिम भागात पेहे, नेमतवाडी आणि सांगवी येथील केळी बागा भुईसपाट झाल्या.

करकंब येथील राजाराम शिंदे, मिलिंद काळे, मच्छिंद्र शिंदे, राजू शेटे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. चंदू नलावडे यांच्या गाईच्या अंगावर वीज पडल्याने ती जखमी झाली. अरुण बनकर, प्रसन्न हत्तरगे, राहुल अनभुले, महेश चौगुले यांच्या केळीच्या बागा पडल्या. सांगोल्यातही करांडेवाडी येथे वीज पडून दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. चिकमहूद येथील प्रतापसिंह दुपडे यांच्या केळीपिकाचे नुकसान झाले.

कोरोनाने नवरा, विजेने लेकरू हिरावले

करमाळा तालुक्यातील रायगाव येथेही बुधवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या वेळी वीज पडून जयदीप बापू पवार (वय १६) या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. कोरोनात त्याचे वडील गेले होते. आई आणि बहिणीसह तो शेती करतो. पण आता काळाने त्याच्यावर अशा पद्धतीने घाला घातला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT