Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Blossoms : आंब्याच्या मोहराने रानमाळ दरवळला

Climate Change Effects : दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी व वातावरणातील बदलाचा परिणाम हंगामी पिकांवर होतो

Team Agrowon

Vikramgad News : दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी व वातावरणातील बदलाचा परिणाम हंगामी पिकांवर होतो. यावर्षी अवकाळी पाऊस झाला असला तरी चांगल्या थंडीमुळे झाडांना मोहर येण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.

यंदा आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर आला आहे. ७० ते ८० टक्के आंबा झाडांना समाधानकारक मोहोर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.विक्रमगड परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आंबा पीक बागायतदार शेतकरी घेतात.

गेल्या सात ते आठ वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे दिसून येते. काही भागात मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर आला असला तरीही नैसर्गिक वातावरणातील बदलांमुळे तो करपून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

सध्या आंब्यांच्या झाडांना उशिराने मोठ्या प्रमाणात मोहर आला, तरी हवामानातील बदल व काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाले तर त्याचा परिणाम आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे बागायतदार सचिन ठाकरे यांनी सांगितले.

यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याने व आंबा पिकाला पोषक वातावरण तयार झाल्याने मोहर आला आहे. ढगाळ वातावरण झाले तर हा मोहोर करपण्याची शक्यता आहे.
ज्ञानेश्वर जाधव, आंबा बागायतदार
यावर्षी अनेक आंब्याच्या झाडांना चांगला मोहर आला आहे. चांगले वातावरण राहिले, तर यंदा चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे.
विजय सांबरे, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT