Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Blossoms : आंब्याच्या मोहराने रानमाळ दरवळला

Climate Change Effects : दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी व वातावरणातील बदलाचा परिणाम हंगामी पिकांवर होतो

Team Agrowon

Vikramgad News : दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी व वातावरणातील बदलाचा परिणाम हंगामी पिकांवर होतो. यावर्षी अवकाळी पाऊस झाला असला तरी चांगल्या थंडीमुळे झाडांना मोहर येण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे.

यंदा आंब्याच्या झाडांना उशिराने मोहर आला आहे. ७० ते ८० टक्के आंबा झाडांना समाधानकारक मोहोर आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.विक्रमगड परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आंबा पीक बागायतदार शेतकरी घेतात.

गेल्या सात ते आठ वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे दिसून येते. काही भागात मोठ्या प्रमाणात झाडांना मोहर आला असला तरीही नैसर्गिक वातावरणातील बदलांमुळे तो करपून जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

सध्या आंब्यांच्या झाडांना उशिराने मोठ्या प्रमाणात मोहर आला, तरी हवामानातील बदल व काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाले तर त्याचा परिणाम आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे बागायतदार सचिन ठाकरे यांनी सांगितले.

यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडी पडल्याने व आंबा पिकाला पोषक वातावरण तयार झाल्याने मोहर आला आहे. ढगाळ वातावरण झाले तर हा मोहोर करपण्याची शक्यता आहे.
ज्ञानेश्वर जाधव, आंबा बागायतदार
यावर्षी अनेक आंब्याच्या झाडांना चांगला मोहर आला आहे. चांगले वातावरण राहिले, तर यंदा चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे.
विजय सांबरे, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीच्या मदतीवरुन घुमजाव, राज्याने केंद्राला प्रस्ताव दोन महिने उशिरा पाठवला, मोठा खुलासा

Rice Market: दर्जेदार तांदळाला बाजारपेठेत चांगली मागणी

Soybean Crisis: मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांचे २९२ कोटींचे नुकसान

Kapas Kisan App: क्लिष्ट ‘कपास किसान अ‍ॅप’; शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप

Local Body Elections: कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकांसाठी चुरशीने मतदान

SCROLL FOR NEXT