Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Survey : कोल्हापुरात पूरग्रस्त भागातील पिकांचे पंचनामे वेगाने सुरू

Agriculture Officer Ajay Kulkarni : कृषी विभागाच्या वतीने पंचनामे वेगात सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी दिली.

Team Agrowon

Kolhapur News : कृषी विभागाच्या वतीने पंचनामे वेगात सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी दिली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या सलग आणि धुवांधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास ५९२ गावांमध्ये साधारणतः ३१ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.

त्यानंतरही सलग पाऊस सुरू आहे आणि धरणांमधून विसर्ग होत असल्यामुळे नद्यांची पातळी कमी होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे फार मोठ्या क्षेत्रात गेले दहा दिवस पाणी थांबून आहे. या सर्व क्षेत्राचे अतिवृष्टी पंचनामे करण्याचे मोठे काम कृषी विभागावर आहे.

या कामाला गती यावी म्हणून श्री. कुलकर्णी यांनी शाहूवाडी तालुक्याचा दौरा करून तेथील कर्मचाऱ्यांच्या बांबवडे व शाहूवाडी येथे बैठका घेतल्या. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये अद्यापही पंचनाम्याचे आदेश निर्गमित झाले नव्हते त्या-त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे सुरू करण्याचे नियोजन केले.

हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून कमी क्षेत्र पंचनाम्यासाठी असलेल्या गावातील कर्मचाऱ्यांना नदीजवळील गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम देण्याचे नियोजन केले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरळीत व्हावे म्हणून आपले आठ अ चा उतारा, आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स कृषी सहाय्यकांना उपलब्ध करून द्यावी आणि पंचनामा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले.

‘तक्रार तातडीने नोंदवावी’

ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी भरले आहे, त्यांनी पीक विम्याच्या ॲपवर आपली तक्रार तातडीने नोंदवावी. या कामी शेतकऱ्यांना गावातील ग्रामपंचायतीचे डेटा एन्ट्री ऑपरेटर कृषी सहाय्यक किंवा गावातील सुशिक्षित तरुण वर्गाची मदत घेता येऊ शकेल.

‘पीक संरक्षणासाठी फवारणीबाबत जागृत राहावे’

अतिवृष्टीमुळे पाणी भरलेल्या शेतांमधील पिकांवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव पुढील काळात होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस कमी होताच भात, सोयाबीन, नाचणी, भुईमूग, ऊस या पिकांवर कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनासनुसार कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्याबाबत गावांमध्ये पंचनामाच्या वेळी आणि त्यानंतर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे संरक्षण करावे असेही आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले.

वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्र पावसाचा जोर कमी झाला असल्याने धरणातून पाण्याचा २९०५ क्युसेकने विसर्ग कमी केला आहे. तर कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी कमीही होऊ लागल्याने असल्याने कृष्णा आणि वारणा काठच्या वारणा काठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT