Summer Fruit Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Fruit Market : उष्म्यामुळे फळांच्या मागणीत वाढ

Fruit Demand : उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खरबूज, टरबूज, शहाळे, उन्हाळी काकडी या थंडावा देणाऱ्या उन्हाळी फळांना मागणी वाढू लागली आहे.

Team Agrowon

Raigad News : वाढत्या उन्हामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, डाळिंब, मोसंबी आणि लिंबांना मागणी वाढल्यामुळे दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे; मात्र पपईची मागणी घटल्याने त्‍याचे दर दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. तर रानमेव्याला उन्‍हाळ्यात सर्वाधिक मागणी असते; मात्र त्‍याच्या उत्‍पादनात घट झाल्याने किमतीमध्ये वाढ झाली आहे.

अंगाची लाही कमी करण्यासाठी आईस्क्रिम पार्लर, ज्यूस, रसवंतीगृह आदी ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून खरबूज, टरबूज, शहाळे, उन्हाळी काकडी या थंडावा देणाऱ्या उन्हाळी फळांना मागणी वाढू लागली आहे.

औषधी दुकानातून ग्लुकोज साखरच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने शहाळ्याचे पाणी पिणे व मलईदार खोबरे खाण्यासाठी नागरिकांची फळविक्रेत्यांकडे गर्दी वाढू लागली आहे.

शहाळे पौष्टिक व आरोग्यदायक असल्याने त्याला सतत मागणी असते; मात्र यंदा उन्हाच्या तीव्रतेबरोबरच शहाळे, कलिंगड, खरबूज यांच्या दराची वाटचाल तेजीकडे चालू आहे. सफरचंद, चिकू, अननस, पेरू, स्ट्रॉबेरी, बोरे, संत्रे आणि द्राक्षांचे दर मात्र स्थिर आहेत. स्ट्रॉबेरीचीही आवक दिवसेंदिवस कमी होत आहे.

तर लिंबांना ज्यूसविक्रेते आणि रसवंतीगृहांकडून मागणी वाढली असल्यामुळे दरामध्ये वाढ झाली आहे. उन्हाळ्यात मिळणारा रानमेवा म्हणजेच जांभूळ, करवंद, रांजणेही बाजारात आली आहे; मात्र त्यांचे दर सामान्यांच्या खिशाला चाट देणारे आहेत.

अलिबागचे प्रसिद्ध ताडगोळे विक्रीसाठी दाखल झाले असून १०० रुपयांना आठ ते नऊ ताडगोळे देण्यात येत आहेत. सध्या उष्म्यामुळे पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी पाणीदार फळांना आहारात घेणे गरजेचे असते. त्‍यामुळे ताडगोळ्याला उन्‍हाळ्यात सर्वाधिक मागणी असल्याने भावदेखील वाढले आहे.

फुलांची आवक घटली

फूलबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या आवकसह मागणीही घटली आहे. त्यामुळे गुलछडीवगळता सर्वच फुलांचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी घटले आहेत. सध्या उत्सवांमुळे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी होती; मात्र त्यानंतर मागणी घटली आहे. उन्हाचे दिवस असल्याने फुलेही लवकर खराब होत असल्याने सकाळी आणलेली फुले जर विकली गेली नाहीत तर सायंकाळपर्यंत ती कोमेजतात. त्यामुळे फूलविक्रेत्यांचेही नुकसान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Insurance 2025 : रब्बी हंगामातही पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ; १० नोव्हेंबरपर्यत ८ हजार ३७९ शेतकऱ्यांचे अर्ज

Onion Price: कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्याने हताश होऊन उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

US Election 2025: अमेरिकेतील निवडणुकांचे निकाल काय सांगतात?

Cotton Farmer Issue: कापूस उत्पादकांची चहूबाजूंनी कोंडी

Bihar Election 2025: राज्यातील लढतीचे ‘केंद्रीय’ पैलू

SCROLL FOR NEXT