Sugarcane Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : गळीत हंगाम तणावपूर्ण वातावरणात सुरुवात; पोलिस बदोबस्तात ऊस वाहतूक करण्याचे नियोजन

Sugarcane Season : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत आंदोलनाच्या सावटावरच ऊसतोडणी सुरू झाली. अनेक कारखान्यांनी पोलिस बदोबस्तात ऊस वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : यंदाचा ऊस हंगाम राज्यात बुधवार (ता. १)पासून सुरू झाला. मात्र पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या सावटाखाली हंगामास सुरुवात झाली. पश्‍चिम महाराष्‍ट्रातील साखर कारखान्यांनी सावधपूर्वक पाऊल उचलत तोडी सुरू केल्या. विशेष करून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत आंदोलनाच्या सावटावरच ऊसतोडणी सुरू झाली. अनेक कारखान्यांनी पोलिस बदोबस्तात ऊस वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे.

यंदाच्या हंगामात कमी दिवस गाळप होण्याची शक्यता असल्याने यंदा १ नोव्‍हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला. शेतकरी संघटनांचे प्राबल्य नसलेल्या भागात ऊस तोडणीस तातडीने प्रारंभ करण्यासाठी हालचाली वेगवान होत्या.

दिवाळीपर्यंत धीम्या प्रमाणात हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे. पूर्ण क्षमतेने मजूर दिवाळीनंतर येण्याची शक्यता असल्याने दिवाळीनंतरच हंगामास वेगवान प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

मराठवाडा, नगर सोलापूर जिल्ह्यात यंदा उसाची वाढ घटल्याने या भागात उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल अशी शक्यता आहे. जादा उत्‍पादन असणारे ऊस पट्टेही यंदा उसाच्‍या वाढीसाठी झगडत असल्याचे चित्र आहे.

उसाचे शिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या सावटाखालीच हंगाम सुरू झाला. विशेष करून कोल्हापूर, सांगली जिल्‍ह्यांत तणावपूर्ण वातावरणात ऊसतोडी सुरू झाल्‍या. अनेक कारखानदारांनी सावध भूमिका घेत ऊसतोडणी सुरू केली होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसाठी शिवारात मजूर पाठविले. अनेक गावांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळाल्‍याशिवाय ऊसतोडणी करू द्यायची नाही, असा निर्णय घेतल्याने अनेक गावांत ऊसतोडणी सुरू झाली नाही.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मात्र ऊसतोडणी सुरू असल्याचे चित्र होते. स्वाभिनानीसह अन्‍य शेतकरी संघटनांनी आंदोलन करण्याची तयारी केली होती. बुधवारी दुपारपर्यंत मात्र कुठे अनुचित प्रकार घडला नसल्‍याचे चित्र होते.

दरम्यान, शेतकरी संघटनांशी चर्चा करण्‍यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाने पुढाकार घेतला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसास टनास चारशे रुपये मिळावेत या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’सह अन्य शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका बजावली आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी (ता. २) कारखानदार व शेतकरी संघटना यांच्या बैठक घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. मात्र सायंकाळी चार वाजेपर्यंत बैठक कधी होणार आहे या बाबतचा तपशील हाती आला नव्‍हता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT