Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : गळीत हंगाम १ तारखेपासून सुरू; कारखानदार आणि संघटना वाद पेटण्याची शक्यता

sandeep Shirguppe

Sugar Factory News : मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गंळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. पंरतु माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील हंगामातील ४०० रुपये दुसरा हफ्ता आणि यंदाची एकरकमी एफआरपी अधिक रक्कम किती देणार यावर पदयात्रा आणि आंदोलन सुरू आहे.

दरम्यान १ तारखेपासून गंळीत हंगाम सुरू झाल्यास कारखानदार आणि संघटना यांच्यात वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ऊस दरावरून कोल्हापुरात आंदोलन पेटले असताना जिल्ह्यातील कारखान्यांनी १ नोव्हेंबरपासून ऊस तोडणीचे पाळीपत्रक तयार केले आहे. गुरुवार (ता. २) शुक्रवार (ता. ३) दरम्यान उस तोडणीला सुरवात केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुताशी कारखान्यांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांबाबत कोणता तोडगा निघणार यावरही तोडणीचे नियोजन अवलंबून राहणार आहे.

जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांना ऊसतोड देण्यासाठी सर्वच सहकारी आणि खासगी कारखान्यांनी नियोजन केले आहे. तसेच दहा ते बारा कारखान्यांनी ऊस तोड करणारे मजूर आपआपल्या कार्यक्षेत्रात आणून ठेवले आहेत. मराठवाड्यातील ऊस तोड मजूर उपलब्ध नसल्याने कारखान्यांचे कामगार मध्य प्रदेशमधून आणले बाणार आहे. दोन दिवसांत हे ऊसतोड मजूर जिल्ह्यात येतील, असे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात यावर्षी उसाचे क्षेत्र कमी आहे. यातच पावसाने पाठ फिरवल्याने उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक कारखान्याला आपले कार्यक्षेत्र सोडून इतर कार्यक्षेत्रातील ऊस वाहतूक करण्यावर भर द्यावा लागणार आहे. तर, दुसरीकडे गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील प्रतिटन ४०० रुपये दुसरा हा मिळावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केली आहे.

दुसरा हप्ता दिल्याशिवाय पुढील दर ठरवला जाणार नाही. तसेच या हत्याशिवाय कारखाने सुरु करू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे दराबाबतही तोडगा काढावा लागणार आहे. यंदाचा गळीत हंगाम दिवाळीपूर्वी सुरु झाल्यास शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेत गाळप करता येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आक्रोश यात्रा काढली जात आहे. यामध्ये गेल्यावर्षीच्या उसाला प्रतिटन ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा, ही प्रमुख मागणी आहे. याबद्दल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अजूनही ही भेट झालेली नाही. श्री. शेट्टी हंगामाबाबत कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, शेट्टींच्या या आक्रोश आंदोलनादरम्यानही कारखाने ऊस तोडीचे नियोजन करत आहेत. याला कितपत यश येणार, हे आता पहावे लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT