Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain Crop Damage : पीकहानीचे पंचनामे अनेक गावांत झालेच नाहीत

Heavy Rain Crop Loss : खानदेशात मागील आठवड्यात किंवा काही दिवसांत अनेक वादळी पाऊस झाला आहे. यात सर्वत्र केळी, भाजीपाला व चाऱ्याची नासाडी, हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील आठवड्यात किंवा काही दिवसांत अनेक वादळी पाऊस झाला आहे. यात सर्वत्र केळी, भाजीपाला व चाऱ्याची नासाडी, हानी झाली आहे. परंतु पंचनामे टक्केवारीच्या खेळात अडकलेले असतानाच काही भागात पंचनामेच झाले नाहीत. कमी नुकसान किंवा ३३ टक्क्यांपर्यंत नुकसान न झाल्याने हे पंचनामे प्रशासनाने टाळल्याची स्थिती आहे.

अनेक गावे या प्रकाराने नुकसान भरपाईपासून वंचित राहतील. पारोळा, अमळनेर, चोपडा आदी भागात नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने जळगावात तयार केला. पण अन्य भागातही नुकसान झाले. तसेच धुळ्यासह नंदुरबारातही असाच प्रकार झाला.

तलाठ्यांवर अधिकचा कार्यभार

एका तलाठ्यावर चार ते पाच गावांचा कार्यभार आहे. अनेक भागात रिक्त पदे आहेत. जेथे तलाठी आहे, तेथे कृषी सहायक नाही तर जेथे कृषी सहायक होते, तेथे तलाठी नसल्याने पिकहानीचे पंचनामे करताना धरसोडीचा प्रकार झाल्याच्या तक्रारी आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, रावेर, जळगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नंदुरबार अशा सर्वच भागातून पंचनामे व्यवस्थितपणे झालेच नाही, अशा तक्रारी आहेत.

काही भागात नुकसान ३० टक्केही नाही, अशी बतावणी करून महसुली कर्मचारी पंचनाम्यांसाठी पोचलेच नाही. तर जेथे पंचनामे सुरू झाले, तेथे कमी मनुष्यबळाची अडचण होती. जामनेर, जळगाव, चोपडा, पाचोरा व अन्य भागात विविध पिकांची हानी झाली आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून आपला अहवाल लागलीच सादर करणे आवश्यक असते.

तसेच अतिजोरदार पाऊस झाल्यास लागलीच पाहणी करून माहिती देणे अनिवार्य आहे. तलाठी गावोगावी पोचलेच नाही. अनेक गावांत सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाला आहे. नंदुरबारात काही भागात सलग चार दिवस अतिजोरदार पाऊसही झाला आहे. यामुळे नुकसान झाले असून, शेतकरी सरसकट भरपाईची मागणी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT