Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

Agriculture Damage: सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे शंभर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष बाग, कांदा आणि फळभाजींना मोठा फटका बसला आहे.
Agriculture Rain
Agriculture RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे शंभर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, गहू यांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक संजय काचोळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील द्राक्ष बागांचा हंगाम जवळपास साठ टक्के संपला आहे. द्राक्षांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांनी द्राक्षाची छाटणी उशिरा केली, त्यांच्या बागा अवकाळी पावसात सापडल्या आहेत. सध्या काढणी सुरू असलेल्या कांदा, गहू आणि कोथिंबिरीसह इतर पालेभाजी, फळभाजीला या पावसामुळे फटका बसला आहे.

Agriculture Rain
Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना फटका

मशागतीच्या काळात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची कामे काही दिवस खोळंबणार आहेत. जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा कृषी विभागाकडून आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अंदाजे शंभर हेक्टर नुकसान झाले असू शकते, असा अंदाज काचोळे यांनी व्यक्त करून पुढील काही दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीची आकडेवारी समोर येईल. पंचनामे तातडीने केले जातील, असेही काचोळे यांनी सांगितले.

नारायणगावला द्राक्ष निर्यातीला खीळ

जुन्नर तालुक्यात द्राक्ष तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नारायणगाव, येडगाव, गुंजाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे द्राक्ष मण्यांना क्रॅकिंग किंवा बुरशी येण्याची शक्यता असल्याने निर्यातदार व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी थांबवली आहे. वाळत घातलेले द्राक्ष मनुके व शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने कांदा उत्पादकांचेही नुकसान झाले आहे.

Agriculture Rain
Rain Alert: राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

कांदा उत्पादकांची धांदल

जुन्नर तालुक्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. मुसळधार पाऊस झाल्यास काढणीस आलेल्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

वाळत ठेवलेले मनुके भिजून नुकसान

द्राक्ष मण्यांना क्रॅकिंग झाल्यास निर्यातक्षम द्राक्षाची विक्री मातीमोल भावाने शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी मनुके तयार करण्यासाठी दुय्यम दर्जाची द्राक्ष उघड्यावर वाळत ठेवली होती. कांदा काढणीनंतर शेतकऱ्यांनी कांदा शेतात ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे मनुके आणि कांदा भिजून नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे आंब्याला लागलेल्या कैऱ्या जमिनीवर पडून काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com