Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Storm Damage Survey : ‘वादळीवाऱ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा’

Cashew Crop : तापमानवाढीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहर करपल्यामुळे पहिल्या टप्प्यातील काजू पिकांवर शेतकरी अवलंबून होते. काजू झाडांवर किरकोळ प्रमाणात काजू बी होती.

Team Agrowon

Sindhudurg News : वादळीवाऱ्याने झालेल्या काजूपीक नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करावेत, अशी मागणी वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाकडे केली. बुधवारी (ता. ५) पहाटे वैभववाडी तालुक्यातील काही गावांमध्ये वादळीवाऱ्याने काजू पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

तापमानवाढीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहर करपल्यामुळे पहिल्या टप्प्यातील काजू पिकांवर शेतकरी अवलंबून होते. काजू झाडांवर किरकोळ प्रमाणात काजू बी होती. परंतु बुधवारी सकाळी साडेसहा ते साडे नऊ या कालावधीत वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली.

खांबाळे, नावळे, करूळ या गावांमध्ये वादळी वाऱ्यांनी काजू पिकांचे अतोनात नुकसान केले. काजूच्या कोवळ्या बिया गळून पडल्या. झाडांखाली कोवळ्या बियांचा खच पडला त्यामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

डोंगरपायथ्यांशी असलेल्या गावांमध्ये नुकसानीची झळ अधिक बसली आहे. काल अनेक शेतकऱ्यांना बागेत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात गळ झाल्याचे दिसून आले. हिरवी पाने, काही झाडांच्या फांद्या देखील तुटल्या आहेत.

यासंदर्भात गुरुवारी (ता. ६) काजू उत्पादक शेतकऱ्यांनी वैभववाडी तहसलदार सूर्यकांत पाटील यांची भेट घेतली. वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT