Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : उजनीतून सोडण्यात येणारे पाणी थांबवा

Team Agrowon

Indapur News : उजनी धरणासाठी शेतकऱ्यांनी घरे, सोन्यासारख्या जमिनी, आस्था असलेल्या मंदिरांवर पाणी सोडले. केवळ राजकीय स्वार्थासाठी धरणातील पाण्याच्या नियोजनाचे तीन तेरा केले आहेत.

अयोग्य पाणी नियोजनाच्या विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी इंदापूर दौड, करमाळा व कर्जत तालुक्यांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १) येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे दोन तास तीव्र रास्ता-रोको आंदोलन केले.

उजनी धरणामधून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ थांबविण्यात यावे, पुणे जिल्ह्यातील धरणांमधून उजनीमध्ये दहा टीएमसी पाणी तत्काळ सोडण्यात यावे. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिली. सध्या उजनी धरणांमध्ये केवळ उणे सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

या असंतोषातून गुरुवारी (ता. १) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले. उजनी धरणग्रस्त बजाव समितीचे महारुद्र पाटील, अरविंद जगताप, प्रा. रामदास झोळ, शिवाजी बंडगर, पराग जाधव, सविता राजेभोसले, शहाजीराव देशमुख, सुभाष गुळवे, राजेंद्र धांडे, अमोल भिसे, संजय जगताप, नंदकुमार भोसले, शहाजी जाधव, सतीश वाघ, नानासाहेब बंडगर, सचिन बोगावत, उदय राजेभोसले तसेच चार तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.

उजनी धरणग्रस्तांच्या मागण्या

उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले आवर्तन तत्काळ बंद करावे, पुणे जिल्ह्यातील धरणांतून दोन वेळा दहा-दहा टीएमसी पाणी उजनीत सोडावे, ठोक जलशुल्क आदेश रद्द करावा. सोलापूर शहरासाठीचे समांतर जलवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करावे. कालवा सल्लागार समितीवर चार तालुक्यांतील प्रतिनिधी निवडावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT