Jayant Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Jayant Patil : इव्हेंट आणि जाहिरातींसाठी ४००-४०० कोटी रुपये खर्च करता, मग शेतकऱ्यांना मदत कधी? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

Aslam Abdul Shanedivan

Pune News : इव्हेंट आणि जाहिरातींसाठी महायुतीचे सरकार ४००-४०० कोटी रुपये खर्च करतं. मात्र रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्याला मदत कधी मिळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला केला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार ११ लाख ६७ हजार २७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर गुरूवारी (ता.५) टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर प्रतिक्रिया देताना, सप्टेंबरच्या सुरुवातीच्या चार दिवसांतच मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील मोठे नुकसान झाले आहे. तब्बल दहा जिल्ह्यांतील सुमारे ८.५ लाख हेक्टर वरील पिके वाहून गेली आहेत. ६०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. नांदेड सर्वाधिक ३ लाख ३९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बुधवारी (ता.४) मराठवाड्यात जावून पाहणी केली खरी. पण ही पाहणी केवळ 'इव्हेंट' नसावा अशी आमची माफक अपेक्षा असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर राज्यातील महायुती सरकार इव्हेंट आणि जाहिरातींसाठी ४००-४०० कोटी रुपये खर्च करत आहे. तर शेतीचे नुकसान झाल्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांला तात्काळ आधार द्यावा. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मराठवाडा आणि विदर्भात सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच पावसाने थैमान घातले. यात प्राथमिक अंदाजानुसार ११ लाख ६७ हजार २७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ६०० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. तर कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा, डाळिंब, पेरु, पपई, भाजीपाला या पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक ३ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषिमंत्री धनंजय मुडें यांनी दिल्या होत्या.

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील उदगीर तालुक्यातील ‘हर’ व ‘लोहारा’ गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली. ‘एनडीआरएफ’चे निकष दूर करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच २-३ दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत हरभरा दर ?

Marathwada Water Storage : मांजरा, निम्न तेरणा धरणाची नव्वदी पार

Animal Husbandary Department : सांगली जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांत ४३ पदे रिक्त

Soybean Procurement : मध्यप्रदेशमध्ये सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू; महाराष्ट्रात सरकारच्या हालचाली संथ!

Orange Crop Damage : संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई द्या

SCROLL FOR NEXT