Agriculture Sowing
Agriculture Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : खानदेशात पेरण्यांना गती; ७५ टक्क्यांवर कामे पूर्ण

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात काही भागांत पाऊस कमी आहे. परंतु जेथे पाऊस बरसला, तेथे पेरण्यांनी या आठवड्यात गती घेतली आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने कमी पावसातही पेरणी केली आहे. सुमारे ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ८० टक्के, धुळ्यात ७१ टक्के आणि नंदुरबारात सुमारे ७३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. नंदुरबारात नवापूर, धुळ्यात शिरपूर भागात पेरणीची टक्केवारी कमी आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, यावल व धरणगाव या भागात पेरण्या रखडत सुरू आहेत. परंतु यावल, धरणगाव व जळगावातही या आठवड्यात पेरण्यांना गती आली आहे. जळगाव, धरणगाव व यावल भागात मागील आठवड्यापर्यंत १० टक्केही पेरणी झाली नव्हती. जळगाव जिल्ह्यात जामनेर, अमळनेर, एरंडोल, भडगाव, पाचोरा या भागात पेरणी गतीने झाली. या भागात पाऊसमानही बरे होते. यामुळे पेरण्यांना सुरुवातीपासून गती होती.

बियाणे विक्रीला प्रतिसाद

खानदेशात कापूस बियाणे विक्रीला प्रतिसाद मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे १९ लाख कापूस बियाणे पाकिटांची विक्री झाली आहे. धुळे व नंदुरबाराही सुमारे साडेसात लाख कापूस बियाणे पाकिटांची विक्री झाल्याची माहिती मिळाली. तसेच सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी बियाणे विक्रीसही प्रतिसाद मिळाला आहे. सोयाबीनच्या सुमारे १८ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे. यात कमी कालावधी व कमी पावसात येणाऱ्या सोयाबीन वाणांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.

पावसाने दिलासा

या आठवड्यात अनेकांनी कमी पावसात किंवा कोरड्या क्षेत्रातही पेरणीचे धाडस केले. कारण उडीद, मूग पेरणीची मुदत संपत आली आहे. काहींनी सोयाबीनचीदेखील पेरणी केली. लागलीच ऊन तापू लागले. उष्णता अधिक होती. त्यात कमाल तापमान मंगळवारी (ता. २५) व बुधवारी (ता. २६) ४० अंश सेल्सिअसवर होते. चार ते पाच तास ऊन होते. यामुळे जमिनीतील वाफसा नाहीसा झाला. पावसाची आळवणी सुरू झाली होती.

कारण महागडे बियाणे शेतकऱ्यांनी पेरले होते. त्यावर पावसाची नितांत गरज होती. यातच गुरुवारी (ता. २७) दुपारी, सायंकाळी व रात्री खानदेशातील अनेक भागांत पाऊस बरसला. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, धरणगाव, जामनेर, भुसावळ आदी भागांत पाऊस आला. धुळ्यातही धुळे, साक्री भागात पाऊस कोसळला. नंदुरबारातही काही भागात पाऊस आला. यामुळे पिकांना जीवदान मिळाले. जळगाव तालुक्यातील भोकर, पिंप्राळा महसूल मंडलांत २० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शिवाय गारवाही तयार झाला. उष्णता कमी झाली. याचाही लाभ केळी, पपई व अन्य पिकांना होणार आहे.

कापूस पीक अधिक

खानदेशात कापूस पिकाची लागवड अधिक होत आहे. एकूण १४ लाख हेक्टरवर तीन्ही जिल्ह्यांत पेरण्या होतील. यात साडेआठ लाख हेक्टरवर कापसाची लागवड अपेक्षित आहे. यात सुमारे एक लाख ८० हजार हेक्टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पीक आहे. त्यात कोरडवाहू कापसाची लागवडही वेगात सुरू आहे. कमाल क्षेत्रातील लागवड पूर्ण झाली आहे. सुमारे सहा लाख हेक्टरवरील कापूस लागवड पूर्ण झाल्याची माहिती आहे. कापसापाठोपाठ मका, उडीद, तूर, ज्वारी या पिकांची पेरणी झाली आहे. मक्याची लागवडदेखील खानदेशात यंदा ७० हजार हेक्टरवर जाईल, असे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

Farmer Registration : रेशीम शेतीसाठी पाचशे शेतकऱ्यांची नोंदणी

Ravikant Tupkar : 'काय कारवाई करायची ती खुशाल करा!'; तुपकरांचे थेट राजू शेट्टींना आव्हान

SCROLL FOR NEXT