Amrit Mahotsav SPPU Agrowon
ॲग्रो विशेष

Amrit Mahotsav SPPU : शिवराय पहिल्या कृषिक्रांतीचे जनक

Dr. Vinay Sahasrabuddhe : एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या कृषिक्रांतीचे जनक होते, असे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांना कसण्यासाठी जमीन, मोफत बियाणे, सिंचन व्यवस्थेसह अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा शेतसारा माफी देण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या कृषिक्रांतीचे जनक होते, असे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व कार्याचे २१ व्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्‍घाटन सत्रात शुक्रवारी (ता.३०) ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या वेळी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रीय परिषदेचे बीजभाषक डॉ. सदानंद मोरे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे टपाल विभागाचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये, संचालिका सिमरन कौर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने युगनिर्माता होते. भारताचा इतिहास छत्रपतींपूर्वीचा आणि नंतरचा असा विभागता येईल. त्यांनी वित्त, सामाजिक, सांस्कृतिक, रणनीती, सुरक्षा, नौदल, गुप्तवार्ता, कृषी आदि विविध आठ क्षेत्रांत क्रांती केली. ते अष्टक्रांतिकारी राजे होते. त्याचा प्रभाव संपूर्ण भारतावर होता. शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर चिंतन करणे गरजेचे आहे.’’

मंत्री विखे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ परिसंवादापर्यंत सीमित न ठेवता सुराज्य, सुशासन, समृद्धी, राष्ट्रकल्याण आणि लोककल्याणकर्ता राजा म्हणून अभ्यासायला हवे. स्वराज्य स्थापनेनंतर सुराज्याची बिजे त्यांनी पेरली. गुलामगिरीमुळे समाजातील हरवलेला आत्मविश्वास महाराजांनी जागा केला.

तर स्वतःच संपत चाललेल्या राजकारण्यांनी सोईस्करपणे छत्रपती शिवाजी महाराजांना जात आणि धर्माच्या भिंतीत विभागले, अशी खंत विखे पाटील यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील नव्या सभागृहाचे उद्घाटन या वेळी झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Scheme : लाडकी बहिण योजनेचा जिल्हा परिषदेच्या १ हजार १८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; प्रकरण आले उघडकीस

Rain Crop Damage : सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगांना फुटले कोंब

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गाला पुराचा तडाखा; जनजीवन विस्कळीत

Sangli Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ७३ टक्के पाणीसाठा

Sangli Rainfall : दुष्काळी भागातील पिकांना पाऊस ठरतोय उपयुक्त

SCROLL FOR NEXT