Sharad Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar Letter : लोकप्रतिनिधींना धोका? सरपंच हत्या प्रकरणावर शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र

Beed Murder Case : मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात पवार यांनी म्हटले आहे, ‘‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली.

Team Agrowon

Mumbai News : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणामुळे लोकप्रतिनिधींच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सभागृहात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे, त्यांचा नीकटवर्तीय वाल्मीक कराड आणि त्याचे साथीदार यांच्यावर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यासह अन्य आमदारांनी जोरदार हल्ला करत या प्रकरणाची दाहकता स्पष्ट केली.

तसेच बीड येथे झालेल्या मोर्चात खासदार बंजरंग सोनवणे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकातील पोलिस निरीक्षकाने बीडमधील समाजमाध्यमावरील समूहात खासदार बजरंग सोनवणे यांना धमकी दिली.

त्यामुळे या प्रकरणाची दाहकता वाढत आहे. बीडमधील कराड याचे समर्थक समाजमाध्यमातून धमकीवजा इशारे देत आहेत. या प्रकरणी अंजली दमानिया यांना धमकीबरोबरच अश्लील संदेशही पाठविण्यात येत आहेत. या पार्श्‍वमूमीवर पवार यांनी पत्र लिहून लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा

मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात पवार यांनी म्हटले आहे, ‘‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला मोठा काळ उलटून गेला आहे. तरीही देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असल्याचे निदर्शनास येते.

बीड-परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत.

असे असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन या लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलिस संरक्षण पुरवावे,’’ अशी मागणी पवार यांनी पत्रात केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT