Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : केंद्र सरकारच्या शेती विरोधी धोरणावरून शरद पवार यांचा हल्लाबोल

Aslam Abdul Shanedivan

Pune News : जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून राज्यातील महायुती सरकारने कारखाने, सहकार चळवळीसाठी कोणतेही काही काम केले नाही. युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. ते रविवारी (ता.१५) धुळ्यातील शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी शेतीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून महायुतीसह केंद्रावर टीका केली. शरद पवार म्हणाले, दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून केंद्रात मी काम केलं. त्यानंतर आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. पण आताच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही. त्यांच्यात आस्था नाही.

तर जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार यांचे शेती विषयक धोरण बदल नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही. याचे उदाहरण म्हणजे कांदा असल्याचे शरद पवार म्हणाले. कांदा उत्पादक शेतकऱ्याने कष्टाने पिक घेतलं. मात्र मोदी सरकारने कांद्याची निर्यातबंदी केली. कांद्याच्या निर्यातीवर शुल्क लादला. त्यामुळे कांद्याला भाव मिळाला नाही. सरकारने गहू, तांदूळाच्याबाबतीतही तेच केलं. जे पिकवाल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी करण्याचे धोरण मोदी सरकारचे आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. पण मी दहा वर्षा कृषिमंत्री म्हणून जे काम केले, त्यामुळे तांदूळ पिकवणारा देश म्हणून भारताचा पहिला क्रमांक लागतो.

बहिणींचा सन्मान राखायला हवाच, पण…

सध्या राज्यात गुंडांचे राज्य असून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. ना कारखाने, राज्य सरकारने ना सहकार चळवळीसाठी काही केलं आणि नाही कारखान्यांसाठी. युवकांना रोजगारही दिला नही. हे सरकार बहिणींना १५०० रुपये देणारं आहे. बहिणींचा सन्मान राखला जावाच. पण त्याचबरोबर बहिणींची अब्रू वाचविण्याकडेही सरकारने लक्ष द्यावं, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

या लोकांच्या डोक्यात सत्तेचा माज

सध्या सत्तेत असणाऱ्या नेत्यांच्या डोक्यामध्ये सत्तेचा माज शिरला आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार दिला. परंतु या लोकांच्या डोक्यात सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्ड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे. राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या, महाराष्ट्राचा चेहरा बदलेला दिसेल, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमधील वाढ कायम

Crop Insurance : पीकविम्याच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींच्या तक्रारी

Vegetables Rate : कांदा सत्तरीत, तर बटाटा चाळिशीत, कोल्हापूरच्या आठवडी बाजारात पालेभाज्यांची रेलचेल

Rakesh Tikait : राकेश टिकैत सोयाबीन आंदोलनात सहभागी, म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि भविष्य वाचवण्यासाठी हा संघर्ष...

Dharshiv DCC Bank : दोन लाख शेतकऱ्यांना सभासद करून घेणार

SCROLL FOR NEXT