Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : राज्याची सत्ता हातात कशी येत नाही, तेच बघतो : शरद पवार

Aslam Abdul Shanedivan

Pune News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला रोखत चांगलीच मजल मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा विजय खेचत आणून अजित पवार यांना शह दिला आहे. यानंतर आता गेल्या तीन दिवसापासून पवार बारामतीचा दुष्काळ दौरा करत आहेत. यादरम्यान पवार यांनी बुधवारी (ता.१९) सांगवी, खांडज, निरावागज, डोरलेवाडी, काटेवाडी आणि पिंपळी गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना आता राज्याची सत्ता ताब्यात घ्यायची आहे. तर ती कशी येत नाही हेच बघतो, असे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या राज्यात खळबळ उडालेली आहे.

शरद पवार सध्या बारामतीतील दुष्काळी दौरा करत असून बारामती मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर पवार यांच्याकडून विधानसभेचा गड जिंकण्यासाठी पेरणी केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. यादरम्यान बुधवारी पवार यांनी वडगांव निंबाळकर (ता. बारामती) येथे दुष्काळी दौऱ्यादरम्यान सभेला संबोधित केले. यावेळी पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासह, ऊस दर, साखर वीज, इथेनॉलच्या दराच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच आज साखर उद्योग अडचणीत आला आहे.

आज दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत. काही लोक त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत आहेत. ते सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी करताना दिसत नाहीत. त्यामुळे लोकांनी त्यांनी त्यांची जागा दाखवली. आता असाच विचार लोकांनी विधानसभेत करावा. ज्याप्रमाणे तुम्ही लोकसभेत चांगेल काम केलं तसेच येणाऱ्या निवडणुकीत करावे. आता काहीही झालं तरी राज्याची सत्ता हातात घ्यायची आहे असे पवार यांनी म्हटले आहे. तसेच राज्याची सत्ता ही शेतकरी, मजुर, कामगांरांसह प्रत्येक घटकासाठी वापरायची असून तुमच्या प्रश्नांसाठी काळजी घेतली जाईल असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.

तसेच मतदारांचे आभार मानताना, सुप्रिया सुळे यांना पुन्हा मताधिक्यानं जिंकून दिले. एक जागरूक खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांचे नावलौकिक आहे. त्यांच्या या कामात मतदारांनी प्रोत्साहन दिलं. तर त्या खासदार फक्त तुमच्या पाठिंब्यामुळेच. त्यामुळे बारामती मतदारसंघाच नाव हे त्या गाजवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी तुम्हाला एवढी खात्री देतो असेही पवार म्हणाले. तसेच लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचाही योग्य विचार करावा लागेल. त्यासाठी कामाला लागावे लागेल, असेही पवार म्हणाले.

दरम्यान याआधी बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा दौरा पवारांनी केला होता. त्यावेळी देखील पवारांनी वातावरण तापवत सरकारवर निशाना साधला होता. त्यानंतर ३५ वर्षांनंतर आता पवार बारामती तालुका पिंजून काढत आहेत. १८ जून रोजी पवार यांनी निंबूत, वडगाव, करंजफूल आणि माळेगाव या गावांचा दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. तर गुरूवारी (ता.२०) रोजी शरद पवार पांढरी, लोणी भापकर आणि मोरगाव गावांना भेटी देणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT