Kolhapur News : आठवडी बाजारांमध्ये आधीच मंदीसदृश वातावरण असताना आता कडक उन्हाच्या झळांचा फटका आठवडी बाजारांना बसत आहे. उन्हामुळे ग्राहक दुपारच्या वेळेत फिरकत नसल्याने बाजार ओस पडल्याचे पाहावयास मिळत आहेत.
त्यामुळे विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करत बसावे लागत आहे. परिणामी बाजारांवर अवलंबून असलेल्या विक्रेत्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या व पेठांची गावे असलेल्या कसबा तारळे, राधानगरी, शिरगाव, आवळी बुद्रुक, धामोड, म्हासुर्ली, राशिवडे बुद्रुक, घोटवडे, सोळांकूर, सरवडे या गावांमध्ये ठराविक दिवशी आठवडी बाजार भरतो.
साहजिकच या बाजारांवर स्थानिक गावांसह परिसरातील अनेक छोट्या वाड्या-वस्त्या अवलंबून असतात. आठवडी बाजाराच्या दिवशी नेहमीचे फिरते विक्रेते, छोटे-मोठे व्यापारी आपली तात्पुरती दुकाने थाटतात. त्या माध्यमातून होणाऱ्या विक्रीवर त्यांचा चरितार्थ चालतो.
अधूनमधून अशा आठवडी बाजारांना मंदीचा फटका बसतो. त्यातच सध्या उन्हाचा पारा वाढल्याने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्याचा परिणाम थेट बाजारातील उलाढालीवर झाल्याने विक्रेते मंदीचा सामना करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.