Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water : भूजल साठा वाढविण्यासाठी संशोधन महत्त्वाचं

महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे. योग्यस्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावातील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकरची संख्या कमी होऊन ‘मिशन भागीरथ प्रयास’ यशस्वी होईल.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्हा परिषदेमार्फत (Nashik ZP) सुरू करण्यात आलेला ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रम स्तुत्य असून शाश्वत प्रयत्नातून भूगर्भातील पाणीसाठा (Ground Water Stock) वाढविण्याच्या दृष्टिने उपाययोजना करण्यात याव्यात, भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यााठी भूगर्भाचा अभ्यास, संशोधन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जलतज्‍ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh) यांनी केले.

नाशिक जिल्हा परिषदेतर्फे अयोजित ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रम कार्यशाळेत राजेंद्र सिंह बोलत होते. या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, डॉ. राहुल आहेर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते.

राजेंद्र सिंह म्हणाले, की महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त आहे. योग्यस्थळे निश्चित करून भूगर्भात या पाण्याची साठवण झाल्यास गावागावातील पाणीप्रश्न सुटून उन्हाळ्यातील टँकरची संख्या कमी होऊन ‘मिशन भागीरथ प्रयास’ यशस्वी होईल.

पालकमंत्री भुसे म्हणाले, की ‘मिशन भगीरथ प्रयास’मधून पिण्याच्या पाण्यासोबतच, शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच ‘मनरेगा’च्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होणार असून दुष्काळ काळात होणारे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘मिशन भगीरथ प्रयास’अंतर्गत साधारण २०० गावांतून ७०५ कामांचे नियोजन करण्यात आले असून या कामांसाठी शासनाकडून निधीची उपलब्धता करण्यात येणार आहे.

‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी सादरीकरण केले.

उल्लेखनीय कामासाठी १० लाखांचा अतिरिक्त निधी

जिल्हा परिषदेचा ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमातून जिल्ह्यातील दुष्काळी गावे भविष्यात निश्चितच पाणीदार होतील, असा विश्वास व्यक्त करीत लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी करावा.

या उपक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाच्या निधीसोबतच १० लाखांचा अतिरिक्त निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government Decision: संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगासाठी १ हजार रुपयांची वाढ; लाभार्थ्यांना मिळणार दरमहा २,५०० रुपये

Rajkumar Patel: मेळघाटचे माजी आमदार पटेल पाचव्यांदा पक्ष बदलाच्या तयारीत?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सातारा गॅझेटवर सर्वांच्या नजरा; काय आहे सातारा गॅझेट?

Cyber Security: सायबर सिक्युरिटीवरून जिल्हा बँक सभेत गोंधळ

Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT